शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणार गदा - रामराव वडकुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा हा विषय राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यापासून न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा हा विषय राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यापासून न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत करण्यात यावे, अशी ती याचिका हाेती. याबाबत न्यायालयाने २०१० मध्ये त्या कृष्णमूर्ती यांच्या बेंचने दिलेल्या निर्णयाचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या १३० जागा ओबीसी प्रवर्गातून कमी होणार होत्या. भाजप सरकार असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने ३१ जुलै २०१९ रोजी वटहुकूम काढून या नव्वद जागा वाचविल्या होत्या. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयाकडून वेळही मागून घेतला. तेव्हापासून जवळपास १५ महिने अर्थात २ मार्च २०२१ पर्यंत राज्य सरकारने केवळ तारखा वाढून घेतल्या. २ मार्च रोजी न्यायालयात शपथपत्र सादर करून आणखी वेळ मागितला. भाजपाच्या शासन काळत काढण्यात आलेल्या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करायला हवे होते. परंतु निहीत वेळेत ते न झाल्याने वटहुकूम व्यपगत झाला. यामुळे न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरेदेखील ओढले. ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द करताना राज्य सरकारने आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले आहे . ५ मार्च रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठित करून आवश्यक आकडेवारी गोळा करण्याची मागणी केली. भाजपने मागणी केल्यामुळे आकसबुद्धीने आयोगाचे गठन न करता सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा आल्याचा आरोपही वडकुते यांनी केला.