शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणार गदा - रामराव वडकुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा हा विषय राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यापासून न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा हा विषय राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यापासून न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत करण्यात यावे, अशी ती याचिका हाेती. याबाबत न्यायालयाने २०१० मध्ये त्या कृष्णमूर्ती यांच्या बेंचने दिलेल्या निर्णयाचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या १३० जागा ओबीसी प्रवर्गातून कमी होणार होत्या. भाजप सरकार असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने ३१ जुलै २०१९ रोजी वटहुकूम काढून या नव्वद जागा वाचविल्या होत्या. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयाकडून वेळही मागून घेतला. तेव्हापासून जवळपास १५ महिने अर्थात २ मार्च २०२१ पर्यंत राज्य सरकारने केवळ तारखा वाढून घेतल्या. २ मार्च रोजी न्यायालयात शपथपत्र सादर करून आणखी वेळ मागितला. भाजपाच्या शासन काळत काढण्यात आलेल्या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करायला हवे होते. परंतु निहीत वेळेत ते न झाल्याने वटहुकूम व्यपगत झाला. यामुळे न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरेदेखील ओढले. ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द करताना राज्य सरकारने आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले आहे . ५ मार्च रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठित करून आवश्यक आकडेवारी गोळा करण्याची मागणी केली. भाजपने मागणी केल्यामुळे आकसबुद्धीने आयोगाचे गठन न करता सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा आल्याचा आरोपही वडकुते यांनी केला.