शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आता पुढचा रस्ता दिसत नाही, आई-पप्पा स्वप्न पूर्ण करू शकलो नाही म्हणत युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 13:20 IST

पुणे येथील एका कंपनीत काम करत शिक्षण, पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत होता.

नर्सी नामदेव (जि. हिंगोली) : आज देशात शासकीय नोकर भरती ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो मुले शिकून बेरोजगार झाली आहेत. तर ग्रामीण भागातील शिकलेल्या मुलांच्या हाताला काम मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुण मुले नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून शहराकडे धाव घेत आहेत. मात्र, शहरात जाऊनसुद्धा उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे या नैराश्येतून अनेक तरुण युवक आपले जीवनच संपवून टाकीत असल्याच्या घटना घडत आहेत. याच नैराश्येतून देऊळगाव येथील रामेश्वर भारत कांबळे (वय २३) या युवकाने आत्महत्या केली.

हिंगोली जिल्ह्यातील देऊळगाव (जहां) येथील सुशिक्षित युवकाने आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण न करता आले नाही. त्यामुळे पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदर २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. देऊळगाव (जहां) येथील रामेश्वर भारत कांबळे (वय २३) हा युवक घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने तो बारावी पास होऊन पुणे येथील एका कंपनीत काम करत शिक्षण, पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत होता. तीन-चार वर्षांत त्याने अनेक भरतीमध्ये सहभागदेखील घेतला होता. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही. आई-वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. आता गावाकडे कोणते तोंड घेऊन जावे. याच नैराश्येतून युवकाने आई-वडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मयताच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

आई, पप्पा, दादा मला माफ करा...मी तुम्हाला दाखविलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मला आता पुढचा रस्ता दिसत नसल्याने हाच मला शेवटचा पर्याय वाटत आहे. माझ्यामुळे कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मी सर्वांची माफी मागतो. मला माफ करा, अशा आशयाची चिठ्ठी गळफास घेतलेल्या ठिकाणी आढळून आली.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू