शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

आता नरकयातना असह्य झाल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:06 AM

आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आदिवासी पँथरच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.कळमनुरी तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या करवाडी येथील रस्त्याचा व गावातील सुविधांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. वारंवार निवेदने, आंदोलन व मोर्चे काढूनही या गावातील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे १८ आॅगस्ट रोजी परत करवाडी येथील गावकºयांनी २५ किमी पायी चालत हिंगोली गाठली.सकाळी ९ वाजता निघालेले मोर्चेकरी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा कचेरीवर धडकले. लेकराबाळांसह, महिला, पुरूष व विद्यार्थी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावाचा संपर्क तुटला होता. ही नित्याचीच बाब आहे. शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मानव विकास बसच माहित नाही. गावात येण्यासाठी रस्ताच नसल्याने करवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.प्रसूतीदरम्यान गरोदर मातांची होणारी हेळसांड, तसेच गंभीर रूग्णाला बाहेरगावी दवाखान्यात नेण्यासाठी ऐनवेळी रस्त्याअभावी वाहनही उपलब्ध होत नाही. त्यामुळे किती दिवस ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी मोर्च्यादरम्यान उपस्थित केले. करवाडी गावाला रस्ता करून द्यावा, गावात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.न्याय : उच्च न्यायालयाने दखल घेतलीकळमनुरी तालुक्यातील करवाडी गावच्या रस्त्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेत सु-मुटो याचिका दाखल केली. जिल्हा प्रशासनाकडूनही करवाडी रस्त्याबाबत खुलासा मागविला होता. परंतु याबाबत अद्याप जि. प. व जिल्हा प्रशासनाने कुठलीही कार्यवाहीकेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. परत शिनिवारी जिल्हाधिकाºयांना करवाडी येथील रस्ता व गावातील सुविधा याबाबत निवेदन सादर केले आहे. जि.प.लाही निवेदन सादर केले आहे, असे भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी सांगितले.रस्त्याअभावी करवाडीत रूग्णवाहिका येत नाहीत. ना खाजगी वाहने येण्यास तयार होतात. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ रोजी गरोदर मातेला खाटेवर ३ किमी प्रवास करावा लागला. हा नेहमीचाच प्रक्रार असल्याचे गावकरी सांगत होते.पायी गाठली हिंगोली४रस्त्याच्या मागणीसाठी करवाडी येथील आदिवासी समाजबांधव लहान-मुलांबाळासह करवारी ते हिंगोली पायी चालत आले. २५ किमी. अंतर पार करत मोर्चेकरी जिल्हा कचेरीसमोर जमले. यावेळी संघटनेतर्फेच मोर्चात सहभागी झालेल्यांना खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा