शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

महाकाय टिप्परसह शेकडो वाहनांना नाही पासिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST

वसमत : वाहतुकीचे नियम न पाळता वाहने बेदरकारपणे चालविण्याच्या घटना वाढल्या आहेत. आरटीओकडून कोणतीच कारवाई होत नाही. रस्ते सुरक्षा ...

वसमत : वाहतुकीचे नियम न पाळता वाहने बेदरकारपणे चालविण्याच्या घटना वाढल्या आहेत. आरटीओकडून कोणतीच कारवाई होत नाही. रस्ते सुरक्षा अभियानासारख्या माेहिमा फोटोसेशनपुरत्या घेतात. परिणामी, वाहनधारक बिनधास्त आहेत. एकट्या वसमत तालुक्यात शेकडो अवजड वाहनांना क्रमांक नसल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. दुचाकी व इतर वाहनांना तर नियमांचे बंधनच नाही. वाळू वाहतूक करणारी शेकडो ट्रॅक्टर टिप्पर विना क्रमाकांची राष्ट्रीय महामार्गावरून धावत असतात, हे विशेष.

नेहमीप्रमाणे दरवर्षी आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. हे अभियान कागदोपत्री यशस्वी व प्रसिद्धीपत्रके काढून रस्ता सुरक्षा अभिायान संपविले जाते. प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नाही. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या वाहनांना, उसाच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर यांना रिफ्लेक्टरसुद्धा लावण्याची तसदी घेतल्या जात नाही. कार्यक्रमात भाषणबाजी केल्यानंतर रिफ्लेक्टर आरटीओ कार्यालयातील खाजगी दलालाच्या हाती सुपुर्त करून पुन्हा पुढच्या वर्षीच रस्ता सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम हाेत असल्याने वसमत तालुक्यातील वाहतुकीच्या नियमांच्या कायद्याला तिलांजली देण्याचा प्रकार होतो. आरटीओचे पथक फक्त परप्रांतातून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहनांची तपासणी अधून-मधून होते.

वसतम तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली पासिंगच न करण्याची अघोरी पद्धत सुरू आहे. ट्रॅक्टर ट्रॉली यासह अवजड वाहनांवरही क्रमांक नसल्याचे चित्र आहे. हट्टा मंडळातील नदी घाटांवर वाळू उपसा करण्यासाठी दररोज शेकडो वाहनांची गर्दी होते. यापैकी ९० टक्के वाहन विना पासिंगची असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळते. मात्र, आजवर एकदाही आरटीओच्या पथकाने याभागात येऊन तपासणी केल्याची घटना घडलेली नाही. हायवा, टिप्पर, ट्रॅक्टरसारखी वाहने जर विना क्रमांकाची विना पासिंगची भरधाव धावत असतील तर इतर वाहनांची काय अवस्था असेल यांची कल्पना न केलेली बरी. तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यांमध्ये अधून - मधून वाळूची वाहने पकडून लावली जातात. क्षमतेपेक्षा जास्त भाराची वाळू घेऊन येणारी वाहने विना क्रमांकाची असतात. जप्त वाहने विना क्रमांकाची असली तरी आरटीओने येऊन पाहणी करून कारवाई केल्याचे कधी ऐकवत नाही.

राष्ट्रीय महामार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावणाऱ्या जीप, ऑटो अशा वाहनांची संख्या वसमतमध्ये प्रचंड आहे. या वाहनांनाही कधी आरटीओचा धाक नाही. खरे तर वाहनधारकांना रस्ता सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शनाची गरज असते. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावरून नियमांना तिलांजली देऊन धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, ऑटोचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना असतो की नाही, याची तपासणी कधी होत नाही. अल्पवयीन मुलेही प्रवासी घेऊन बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचा प्रकार सर्रास दिसतो.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन नोंदणी निलंबनाची कारवाई करण्याचे प्रावधान आहे. मात्र, वाहनांची नोंदणीच न करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याकडेच आरटीओेचे लक्ष नसल्याने काय कारवाई होणार, हा प्रश्न आहे. रस्ता सुरक्षा अभियानात निदान यावर्षी तरी प्रत्यक्षात अभियान राबवून खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षित करण्याची गरज आहे.

बॉक्स

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांतून वाळू वाहतूक करण्याचा प्रकार वसमतमध्ये उजेडात आला होता. नदीवरून वाळू घेऊन येणारे टाटा एस कंपनीचे ११ छोटाहत्ती वाहने तहसीलदारांनी नोव्हेंबर महिन्यात पकडली होती. मालवाहू वाहनातून अनधिकृत वाळू वाहतूक प्रकार चर्चेत आला होता. आठ दिवस वाहने तहसीलमध्ये उभी होती. मात्र, आरटीओने कधी चौकशी केली नाही. पोलीस ठोण आवारात, तहसीलमध्येही विना पासिंगची वाहने असतात. एकट्या हट्टा भागात जरी पथक गेले तरी शेकडो विना पासिंग ओव्हरलोडची वाहने दिसतील.