शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असताना मुक्या जनावरांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात किती ...

हिंगोली : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत असताना मुक्या जनावरांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे ?, टंचाई जाणवल्यास काय नियोजन करणार ? या प्रश्नाचे दोन्ही पशुसंवर्धन कार्यालयाकडे उत्तर नाही. चारा नियोजनासंदर्भात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवित असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र कोरोना रोखण्याच्या धावपळीत मुक्या जनावरांकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात मागील पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने माळरानासह पडीक जमिनीवर चांगले गवत उगवले होते. त्यात जमिनीत ओलावा असल्याने अनेकांनी ज्वारी, मका पिकाची पेरणी केली होती. यातूनही काही प्रमाणात चारा उपलब्ध झाला. परंतु, पावसामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे चारा म्हणून वापरले जाणारे कुटार अपेक्षित उपलब्ध झाले नाही. त्यामुळे खरीप हंगामापर्यंत चारा शिल्लक राहणार की नाही, याबाबत ठोस कोणालाही सांगणे आवघड झाले आहे. जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे ? चारा टंचाई जाणवल्यास काय उपाययोजना कराव्या लागणार ? याची जबाबदारी कोणी उचलायची याबाबत जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामध्ये चालढकल सुरू आहे. दोन्ही कार्यालये एकमेकांकडे बोट दाखवित आहे. यातून चारा उपलब्धतेचे नियोजनच केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील बहुतांश कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे कामकाजावरही परिणाम होत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. दोन्ही कार्यालयात मोजकेच कर्मचारी उपलब्ध होते.

जिल्ह्यातील पशुधन

गाय वर्गीय - २,२९,७५६

म्हैस वर्गीय - ७३,९२०

मेंढ्या - १६,७४२

बकऱ्या - १,४६,७८२

डुकरे - १०४८

चारा नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची आहे. जिल्ह्यातील चाऱ्याची सद्य:स्थिती काय आहे, याची माहितीही त्यांच्याकडेच असते. तरीही चार ते पाच दिवसांत चाऱ्यासंदर्भात आढावा घेऊन माहिती गोळा केली जाईल.

- डॉ. लक्ष्मण पवार, उपायुक्त, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय

चारा नियोजनाची जबाबदारी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाची आहे. त्यांच्याकडेच चाऱ्यासंदर्भातील माहिती मिळेल. आगामी काळात चारा टंचाई जाणवू नये, यासाठी मका बियाणे देण्याचे नियोजन आखले आहे.

- डॉ. जावळे, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. हिंगोली