शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कोथळजच्या नाथजोगींचा सोमवार पालावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:34 IST

मुले चोरणारे समजून धूळे जिल्ह्यात पाच जणांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातील भटक्या समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देहिंगोलीपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या कोथळज येथे मोठ्या संख्येने हा नाथजोगी समाज आहे.

- दयाशिल इंगोलेहिंगोली : मुले चोरणारे समजून धूळे जिल्ह्यात पाच जणांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातील भटक्या समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. या दहशतीपोटीच हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील नाथजोगी समाजातील एकही जण सोमवारी भिक्षुकीसाठी बाहेर पडला नाही. 

हिंगोलीपासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या कोथळज येथे मोठ्या संख्येने हा नाथजोगी समाज आहे. जवळपास ९० घरे असून लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. सात ते आठ कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला असून इतर इतर सर्व झोपड्या करून वास्तव्यास आहेत. भूमिहीन असल्यामुळे भिक्षुकी हेच त्यांच्या उपजिविकेचे साधन आहे. सोमवारी सकाळपासून धुळ्यातील घटनेचीच चर्चा येथे सुरू होती. भयभीत होऊन सर्वजण एकत्र मंदिर परिसरात कुटुंबियांसमवेत जमले होते.

सोमवारी नाथजोगी समाजातील एकही माणूस भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला नाही. शहरासह ग्रामीण भागातही भिक्षा मागणाऱ्यांकडे संशयीतरित्या पाहिले जात आहे. ‘परत गावात दिसू नकोस’ असा दमही दिला जात आहे, असे हे समाजबांधव सांगत होते. प्रशासनाने भटक्या समाजबांधवांवर होणारा अन्याय दूर करावा अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. जिल्ह्यात सांगवी, सिद्धेश्वर, अंजनवाडा, औंढानागनाथ, गोळेगाव, माथा, वगरवाडी आदी ठिकाणी हा नाथजोगी समाज वास्तव्यास आहे. 

मुले शिक्षणाच्या प्रवाहातकोथळज येथील नाथजोगी समाजातील ६५ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल आहेत. ही मुले सध्या हिंगोली येथील वस्तीगृहात राहतात. समाजबांधवांचे मतदान यादीत नाव आहे, परंतु शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून ते कोसो दूर आहेत. मोजक्याच लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. 

मोर्चा काढण्यात येईल धुळ्यातील घटनेचा राज्यस्तरीय संघटनेतर्फे निषेध केला जाणार आहे. हिंगोली येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले जाणार असून मोर्चाही काढण्यात येणार आहे. - आप्पा काशिनाथ शिंदे, रा. कोथळज  जि. हिंगोली.

कुटुंब चिंताग्रस्त अफवेमुळे होणाऱ्या हत्या घृणास्पद आहेत. भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडताना कुटुंब चिंताग्रस्त होत आहे. शहराकडे कामानिमित्त गेलल्या युवकाला  थोडाही उशिर झाला  तर काळजाचा ठोका चूकतो आहे. - बाबासिध्दू शितोळे, कोथळज जि. हिंगोली

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाHingoliहिंगोलीSocialसामाजिक