शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

"माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 19:01 IST

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे

हिंगोली - शिवसेनेतील फुटीनंतर बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन करणारे, डोळ्यातून अश्रू ढाळत आपली शिवसेना भक्ती सांगणारे आमदार संतोष बांगर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेले. त्यानंतर, शिंदेंच्या गटाचं उदो उदो करत त्यांनी ठाकरे गटावर अनेकदा हल्लाबोल केला. याच वादातून शिवसेनेच्या महिला सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार संतोष बांगर यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे, बांगर यांच्या विधानानंतर पौळ आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात.  

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे. त्यातच या निकालावर भाष्य करताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी भलतेच विधान केले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन, असं धक्कादायक विधान बांगर यांनी केले. बांगर यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, काहींनी त्यांचं हे विधान नौटंकी असल्याचं म्हटलं. कारण, यापूर्वीही त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मिशी कापण्याचं चॅलेंज दिलं होतं. पण ते पूर्ण केलं नाही. आता, त्यावरुनच शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांनी बांगर यांना पुन्हा डिवचलं आहे.  

दादुड्या, तू फक्त चॅलेंजच करतो, आधी मिशीचं चॅलेंज केलं होतं, ते कुठे पूर्ण केलं. मात्र, आताचं चॅलेंज नक्की पूर्ण कर बरं, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी मृताच्या नातेवाईकांप्रमाणे रडण्याची नक्कल करुन, माझा कंस भाऊ गेला गं, माय काऊन फाशी घेतली गं... असं रडण्याचं नाटक करत रडगाणंही गायलं.

हिंगोली जिल्ह्यातील शिवसेने पदाधिकाऱ्यांना पौळ यांनी आवाहनही केलं आहे.. भरचौकात फाशीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य आणून ठेवायचं आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पतंप्रधान होणार नाहीत, तर माझा दादुड्या म्हणजे आमदार संतोष बांगर साधा सरपंचही होणार नाही. इथला आमदार, खासदार हे सगळेच पडणार आहेत. आपल्या सगळ्यांचा भगवा झेंडा इथं फडकणार आहे. त्यामुळे, आता सर्वांनी टीमवर्क करायचं आहे, असे म्हणत अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. तसेच, बांगर यांनी हे चॅलेंज नक्की पूर्ण करावं, त्यांच्याकडे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, खाऊन-पिऊन काळजी घ्यावी, असेही पौळ यांनी म्हटले. 

काय म्हणाले आमदार बांगर

सर्वसामान्यांच्या घरात लोकांना माहिती आहे आपल्याला शिवेसना-भाजपालाच निवडून द्यायचे आहे. मी निकाल आमच्याच बाजूने लागणार हे सांगितले होते. २०२४ ला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहेत. जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन. या देशात मोदीच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदारNarendra Modiनरेंद्र मोदीHingoliहिंगोली