शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

"माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 19:01 IST

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे

हिंगोली - शिवसेनेतील फुटीनंतर बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन करणारे, डोळ्यातून अश्रू ढाळत आपली शिवसेना भक्ती सांगणारे आमदार संतोष बांगर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेले. त्यानंतर, शिंदेंच्या गटाचं उदो उदो करत त्यांनी ठाकरे गटावर अनेकदा हल्लाबोल केला. याच वादातून शिवसेनेच्या महिला सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार संतोष बांगर यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे, बांगर यांच्या विधानानंतर पौळ आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात.  

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे. त्यातच या निकालावर भाष्य करताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी भलतेच विधान केले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन, असं धक्कादायक विधान बांगर यांनी केले. बांगर यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, काहींनी त्यांचं हे विधान नौटंकी असल्याचं म्हटलं. कारण, यापूर्वीही त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मिशी कापण्याचं चॅलेंज दिलं होतं. पण ते पूर्ण केलं नाही. आता, त्यावरुनच शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांनी बांगर यांना पुन्हा डिवचलं आहे.  

दादुड्या, तू फक्त चॅलेंजच करतो, आधी मिशीचं चॅलेंज केलं होतं, ते कुठे पूर्ण केलं. मात्र, आताचं चॅलेंज नक्की पूर्ण कर बरं, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी मृताच्या नातेवाईकांप्रमाणे रडण्याची नक्कल करुन, माझा कंस भाऊ गेला गं, माय काऊन फाशी घेतली गं... असं रडण्याचं नाटक करत रडगाणंही गायलं.

हिंगोली जिल्ह्यातील शिवसेने पदाधिकाऱ्यांना पौळ यांनी आवाहनही केलं आहे.. भरचौकात फाशीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य आणून ठेवायचं आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पतंप्रधान होणार नाहीत, तर माझा दादुड्या म्हणजे आमदार संतोष बांगर साधा सरपंचही होणार नाही. इथला आमदार, खासदार हे सगळेच पडणार आहेत. आपल्या सगळ्यांचा भगवा झेंडा इथं फडकणार आहे. त्यामुळे, आता सर्वांनी टीमवर्क करायचं आहे, असे म्हणत अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. तसेच, बांगर यांनी हे चॅलेंज नक्की पूर्ण करावं, त्यांच्याकडे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, खाऊन-पिऊन काळजी घ्यावी, असेही पौळ यांनी म्हटले. 

काय म्हणाले आमदार बांगर

सर्वसामान्यांच्या घरात लोकांना माहिती आहे आपल्याला शिवेसना-भाजपालाच निवडून द्यायचे आहे. मी निकाल आमच्याच बाजूने लागणार हे सांगितले होते. २०२४ ला ठामपणे छाती ठोकून सांगतो येणाऱ्या एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पुन्हा येणार आहेत. जर मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन. या देशात मोदीच पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदारNarendra Modiनरेंद्र मोदीHingoliहिंगोली