शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

By विजय पाटील | Updated: April 24, 2024 12:11 IST

आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले.

कुरूंदा (हिंगोली): किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाचा पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना वसमत तालुक्यातील कानोसा येथे २३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात आज सकाळी ठिय्या मांडला. 

कानोसा येथे मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास रामकीशन तानाजी बेंडे (३२) याच्या पोटात चाकू भोसकला. तसेच छातीवर धारदार शस्त्राने वारही करण्यात आले‌‌. यातच रामकीशनचा मृत्यू झाला. दरम्यान, आज सकाळी मृताच्या नातेवाईकांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठत आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत ठिय्या मांडला. खूनाची घटना घडून बराच काळ लोटला तरी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची कोणतीच हालचाल न झाल्याने कानोसा येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. 

दरम्यान, आरोपीच्या शोधात कुरुंदा पोलिसांनी पथक रवाना केले आहे. आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले. कुरुंदा भागातील नेहरूनगर भागातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. मयताच्या शेतातील आखाड्यावर हा प्रकार झाला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी