शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

'मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरु करा'; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 19:17 IST

अडाणी पिढी घडवायची नसेल तर लवकर शाळा सुरू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली. 

आखाडा बाळापूर  ( हिंगोली ) : कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू , बाजार सुरू ,मंदिरे सुरू ,सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ आले. तुमचे सगळे म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून पोलिसांनी पिच्छा सोडवून घेतला. शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांनी मांडलेला ठिय्या चांगलाच रंगला. 

आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात आज दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाळकरी विद्यार्थी जमले. ठाणेदारांना भेटण्यासाठी त्यांनी हट्ट धरला. ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी त्यांचे म्हणणे ऐकले. आमच्या शाळा सुरू करा, आमच्या शाळाच  बंद का?असे प्रश्न विचारत होते. त्यावेळी पोलीस त्यांना, शासनाने तुमच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवलेल्या आहेत अशी उत्तरे दिली. महामारीची लागण विद्यार्थ्यांना होऊ नये ,विद्यार्थी सुरक्षित राहावा यासाठी शाळा बंद ठेवल्याचे सांगितले .पण विद्यार्थ्यांनी त्यानंतर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आम्हाला आमच्या भविष्याची चिंता वाटत असून गेल्या दोन वर्षापासून आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अडाणी पिढी घडवायची नसेल तर लवकर शाळा सुरू करा आणि आम्हाला न्याय द्या अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली. 

त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रही पोलिसांना सादर केलं. 'हम बच्चो का नारा है , शिक्षा अधिकार हमारा है ' असा शेवट करणारे हे पत्र पोलिसांना देऊन आमच्या शाळा लवकरात लवकर सुरू करा असे म्हणत त्यांनी ठिय्या मांडला. तब्बल तासभर विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून भंडावून सोडले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे ठाण्यात दाखल झाले .त्यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेत तुमच्या सर्व मागण्या आणि तुमचे हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पोहोचवतो, निर्णय ते घेतील असे म्हणत पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांतपणे घरी जाण्यास सांगितले. 

शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या हा ठिय्या बाळापुरात आज चर्चेचा विषय बनला आहे.  एरवी पोलिसांच्या रुबाबाला घाबरणारे विद्यार्थी आज मात्र आपल्या अधिकारासाठी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करत होते आणि पोलीस मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे खरे आहे असे म्हणत त्यांची समजूत काढत होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे