शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

विषय समिती सदस्य; २८ रोजी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:21 AM

परभणी : येथील जिल्हा परिषदेतील ९ विषय समित्यांच्या सदस्यांची २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता जि.प.च्या सभागृहात निवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ११६२ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेततळ्याच्या कामावर २ कोटी ७५ लाखांचा खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात शेतकऱ्यांना ३ हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागानेही गावा-गावात जावून कृषी सहाय्यकांमार्फत मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार आणि प्रचार केला. याचे फलित म्हणून पूर्णा तालुक्यातून ४१९, पालम २२०, सेलू ४५९, परभणी ७३८, जिंतूर ९८९, मानवत ४३१, गंगाखेड ७३७, पाथरी ५१२, सोनपेठ २९२ असे एकूण ४ हजार ८०५ अर्ज मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यामधून कृषी विभागानेही छाननी करुन ४ हजार ७१७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. आतापर्यंत यातील पूर्णा तालुक्यात १००, पालम ४३, सेलू ११६, परभणी २१५, जिंतूर ३०५, मानवत १६२, गंगाखेड १४०, पाथरी ४६ आणि सोनपेठ ३५ अशा एकूण ११६२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४२ शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी कृषी विभागाकडून ३० बाय ३० शेततळ्यासाठी ५० हजार रुपये या प्रमाणे अनुदानही देण्यात येत आहे. त्यामुुळे शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात पावसाच्या पाण्यातून सिंचनाची सोय निर्माण व्हावी, या हेतूने शेततळे घेतले. २०१६-१७ या एका वर्षात ११६२ शेततळे पूर्ण झाले आहेत.यासाठी कृषी विभागाने २ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदानही लाभार्थ्यांना वाटप केले आहे. शेतकऱ्यांनीही या योजनेअंतर्गत शेततळे घ्यावे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.