शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

ध्यानसाधना, विपश्यनाने रागावर नियंत्रण शक्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:28 IST

राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.मनात राग असल्याने त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. रागाच्याभरात अनेक हातून चूका घडतात. परंतु राग शांत झाल्याने रागीट व्यक्ती नंतर पश्चाताप करते. राग ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून निश्चतच राग येतो. रागामुळे नातेसंबधही दुरावतात. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. नेहमी मनात राग असलेल्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिड बनत जातो. त्यामुळे मन उत्साही व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे रागातून सुटका करून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ध्यानसाधना तसेच विपश्यनेचा मार्ग अवलंबविल्यास नक्कीच फरक पडतो. अनेकदा कार्यालयीन जबाबदारी पार पाडताना जर वेळेत काम संबंधित कर्मचाऱ्याकडून झाले नाही तर मलाही राग येतो. परंतु तो राग काही क्षणापुरताचा असतो. काम वेळेत व्हावे हा मनात दृष्टिकोन रूजावा यासाठी राग व्यक्त केला जातो. राग व्यक्त करण्याचे अनेक कारणे असू शकतात. परंतु प्राणायाम, ध्यानसाधना व विपश्यना केल्याने नक्कीच रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.प्रशासकीय सेवेत असताना अनेकदा मनाविरुद्ध बाबी होत असल्याने वाद व्हायचे. मात्र नंतर शांततेने घेतल्यास समस्या सोडविण्यास वेळ मिळतो, ही गुरुकिल्ली मिळाली. त्यामुळे आपोआपच संयमाने रागाची जागा घेतली. त्याचा वैयक्तिक आयुष्यात फायदा झाला.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक