शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

मग्रारोहयोवर पुन्हा वाढले मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:53 IST

जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत.मग्रारोहयोच्या कामांबाबत प्रशासन उदासीन असल्याच्या तक्रारी मागील समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. तर सिंचन विहिरींच्या कामांवरून चांगलेच घमासान झाले होते. मार्च एण्डला तर ही कामे मोठ्या प्रमाणात ठप्प पडली होती. त्यामुळे मजुरांचा आकडा चार ते पाच हजारांवर आला होता. आता पुन्हा मजुरांची संख्या वाढू लागली आहे.जिल्ह्यातील ५६९ पैकी २३२ ग्रा.पं.मध्ये ही कामे सुरू झाली आहेत. यात ग्रामपंचायतींच्या कामांची संख्या ९६१ तर विविध यंत्रणांच्या कामांची संख्या ९७ एवढी आहे. यामध्ये तालुकानिहाय औंढ्यात २४४ कामांवर ३६५४, वसमतला ४५ कामांवर ५५६ मजूर, हिंगोलीत २९२ कामांवर ४00२ मजूर, कळमनुरीत २६३ कामांवर ३२९१ मजूर, सेनगावात २१४ कामांवर २७५१ मजुरांची उपस्थिती आहे. यात औंढा-५३, वसमत-१८, हिंगोली-५४, कळमनुरी-६९ तर सेनगावातील ३८ ग्रामपंचायतींनी कामे सुरू आहेत.अनेक ग्रामपंचायतींची उदासीनताचजिल्ह्यातील ५६९ पैकी केवळ २३२ ग्रामपंचायतींनीच कामे सुरू केल्याने ५0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.ची या कामांसाठी उदासीनताच दिसून येत आहे. विशेष म्हणजे वसमत तालुक्यात सर्वांत कमी ग्रामपंचायतींचा सहभाग या योजनेत दिसून येत आहे. इतर यंत्रणाही केवळ ९७ कामेच करीत असल्याने त्यांचीही कामे वाढण्याची गरज आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorतहसीलदार