शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, ...

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, यासाठी कामगार गावी परतण्याचे नियोजन करीत आहेत. तर कामगार गावी परत गेले तर व्यवसायाचे कसे होणार याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात दोन वेळेस संचारबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. आता तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासनसुद्धा चिंतेत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याच्या निर्णयापर्यंत शासन पोहचले आहे. त्यामुळे राज्यात केव्हाही लॉकडाऊन लागू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कामानिमित्त आलेले कामगार गावाकडे परत जाण्याच्या तयारीत आहेत. ऊसतोड कामगार तर दोन दिवसांपासून गावी परत येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बांधकाम कामगार, उद्योग क्षेत्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील कामगारांची संख्याही मोठी आहे. आता हे सर्व गावी परत जाण्याचा बेत आखत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे, तर कामगार परत गेले तर आपल्या व्यवसाय, उद्योगावर परिणाम होईल, याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झालेला असताना पुन्हा कामगार गावी गेला तर व्यवसाय कोलडून पडण्याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

कामगार कुठे किती?

औद्योगिक वसाहत - १५०

हॉटेल व्यवसाय - १५००

बांधकाम क्षेत्र : ४३३०७

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार ?

लॉकडाऊन लागले तर व्यवसाय ठप्प पडतील. त्यामुळे हाताला काम उरणार नाही. हाताला कामच नसेल तर इथे थांबून उपयोग काय, त्यामुळे लॉकडाऊन लागले तर गावाकडे परत जाणार आहे.

-मुन्ना यादव, गढवाल

लॉकडाऊन लागल्यास सर्व व्यवसाय बंद ठेवले जातात. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. शिवाय शासनही मदत करीत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागल्यास इथे थांबण्यापेक्षा गावाकडे परत जाण्याचा बेत आखला आहे.

-परमवीर सिंग, पंजाब

लॉकडाऊनमध्ये गतवर्षी बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. अगोदरच या व्यवसायात जास्त मजुरी नसते. त्यामुळे लॉकडाऊन काळात खायचे तरी काय ? लॉकडाऊन लागल्यास नक्कीच गावाकडे परत जाणार आहे.

-भगवान कोरडे

कामगार गावी परतला तर ...

लॉकडाऊन लागल्याने कामगार गावी परतला तर व्यवसाय ठप्प होईल. पुन्हा कामगार येतीलच याची श्वाश्वती नसते. तसेच नव्याने व्यवसायाला सुरुवात करावी लागेल. यात मोठे नुकसान होईल.

- राजेश जैस्वाल, हॉटेल व्यावसायिक

लॉकडाऊन लागला तर कामगार गावी परत जातात. गावाकडे गेलेला कामगार पुन्हा परत यायला उशीर करतात. यात व्यवसायाचे नुकसान होते. तसेच लॉकडाऊनमध्ये कामगारांनाही काम उपलब्ध नसते.

- ललीतराज खुराणा, उद्योजक

अगोदरच कामगार मिळत नाहीत. त्यात लॉकडाऊन लागला तर व्यवसाय ठप्प पडेल. त्यामुळे लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसह कामगारांचेही नुकसान होईल.

- मंजूर खॉ चाँद खॉ पठाण, बांधकाम व्यावसायिक