शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, ...

हिंगोली : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शासन पुन्हा लॉकडाऊन लावण्यात तयारीत आहे. लॉकडाऊन लागले तर गैरसोय होऊ नये, यासाठी कामगार गावी परतण्याचे नियोजन करीत आहेत. तर कामगार गावी परत गेले तर व्यवसायाचे कसे होणार याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात दोन वेळेस संचारबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला. आता तर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासनसुद्धा चिंतेत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याच्या निर्णयापर्यंत शासन पोहचले आहे. त्यामुळे राज्यात केव्हाही लॉकडाऊन लागू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कामानिमित्त आलेले कामगार गावाकडे परत जाण्याच्या तयारीत आहेत. ऊसतोड कामगार तर दोन दिवसांपासून गावी परत येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बांधकाम कामगार, उद्योग क्षेत्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील कामगारांची संख्याही मोठी आहे. आता हे सर्व गावी परत जाण्याचा बेत आखत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे, तर कामगार परत गेले तर आपल्या व्यवसाय, उद्योगावर परिणाम होईल, याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झालेला असताना पुन्हा कामगार गावी गेला तर व्यवसाय कोलडून पडण्याची धास्ती उद्योजकांनी घेतली आहे.

कामगार कुठे किती?

औद्योगिक वसाहत - १५०

हॉटेल व्यवसाय - १५००

बांधकाम क्षेत्र : ४३३०७

हाताला काम नाही, इथे तरी काय करणार ?

लॉकडाऊन लागले तर व्यवसाय ठप्प पडतील. त्यामुळे हाताला काम उरणार नाही. हाताला कामच नसेल तर इथे थांबून उपयोग काय, त्यामुळे लॉकडाऊन लागले तर गावाकडे परत जाणार आहे.

-मुन्ना यादव, गढवाल

लॉकडाऊन लागल्यास सर्व व्यवसाय बंद ठेवले जातात. त्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. शिवाय शासनही मदत करीत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागल्यास इथे थांबण्यापेक्षा गावाकडे परत जाण्याचा बेत आखला आहे.

-परमवीर सिंग, पंजाब

लॉकडाऊनमध्ये गतवर्षी बांधकाम व्यवसायही ठप्प झाला होता. अगोदरच या व्यवसायात जास्त मजुरी नसते. त्यामुळे लॉकडाऊन काळात खायचे तरी काय ? लॉकडाऊन लागल्यास नक्कीच गावाकडे परत जाणार आहे.

-भगवान कोरडे

कामगार गावी परतला तर ...

लॉकडाऊन लागल्याने कामगार गावी परतला तर व्यवसाय ठप्प होईल. पुन्हा कामगार येतीलच याची श्वाश्वती नसते. तसेच नव्याने व्यवसायाला सुरुवात करावी लागेल. यात मोठे नुकसान होईल.

- राजेश जैस्वाल, हॉटेल व्यावसायिक

लॉकडाऊन लागला तर कामगार गावी परत जातात. गावाकडे गेलेला कामगार पुन्हा परत यायला उशीर करतात. यात व्यवसायाचे नुकसान होते. तसेच लॉकडाऊनमध्ये कामगारांनाही काम उपलब्ध नसते.

- ललीतराज खुराणा, उद्योजक

अगोदरच कामगार मिळत नाहीत. त्यात लॉकडाऊन लागला तर व्यवसाय ठप्प पडेल. त्यामुळे लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसह कामगारांचेही नुकसान होईल.

- मंजूर खॉ चाँद खॉ पठाण, बांधकाम व्यावसायिक