शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सोडेगाव येथे जलदिंडीचा समारोप कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:04 IST

लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.जलदिंडी समारोप प्रसंगी खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, औंढा पं. स. सभापती भिमराव भगत आदी उपस्थित होते.खा. राजीव सातव यांनी जलदिंडीत सर्व सहभागींचे अभिनंदन केले. कयाधू मुख्य नदी असून लोकसहभाग मिळाला तर नदी जिवंत होऊ शकते असे ते म्हणाले. केंद्रशासनाकडूनही या कामासाठी मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना खा. सातव म्हणाले प्रत्येकांनी दैनंदिन डायरी लिहिण्याचा सराव करावा. स्वत:चा गुरु हा स्वत:च असतो. डायरी लिहिण्याची सवय जडली तर आपण किती चुकलो किंवा यशस्वी झालो याचा अभ्यास करणे शक्य होते. त्यातून सुधारणाही करता येते असे त्यांनी सांगितले.आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून वाहते. तसेच नदीचे खोरे हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. नदी जिवंत झाली तर बहुतांश कुटुंब सुखी होतील व शेतीविषयक समस्यांना आळा बसेल.उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले जल हे जीवन आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पाणी उपसा थांबवून पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.विभागीय वनाधिकारी केशवराव वाबळे म्हणाले पर्यावरण दिनाच्या निमिताने जलदिंडीचा समारोप होत आहे. परंतु प्रत्येकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. तसेच रोपांची जोपासनाही करावी. जर जंगलाचे प्रमाण वाढले तर जमिनीतील पाणी पातळी वाढू शकेल. जैवविविधता टिकून राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना झाड वाटप करण्यात आले. उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईराव म्हणाले सर्व समस्यांचे मूळ हे पाणी आहे. जर पाणी नसले तर समस्या वाढतील आणि मानव विकास निर्देशांकही खालावला जाईल. त्यामुळे कयाधू नदीला पाझर फोडावा लागेल. त्यासाठी लोकांच्या मनात पाझर फोडणे गरजेचे आहे. शाहीर धम्मानंद इंगोले यांनी गीत सादरीकरणातून महत्त्व सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक