शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

सोडेगाव येथे जलदिंडीचा समारोप कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:04 IST

लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसहभागातून कयाधू नदीचे पुनरूज्जीवीतसाठी धडपड केली जात आहे. मृत नदी जीवंत करण्यासाठी मागील दहा दिवसांपासून जलदिंडीच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करण्यात आली. उगम ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने २५ मे ते ५ जून २०१८ दरम्यान काढण्यात आलेल्या पायदळ जलदिंडीचा मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे समारोप करण्यात आला. नागरीकांमध्ये नदी विषयक समज जाणून घेणे व लोकचळवळ उभी करणे हा जलदिंडीचा मुख्य उद्देश होता.जलदिंडी समारोप प्रसंगी खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, औंढा पं. स. सभापती भिमराव भगत आदी उपस्थित होते.खा. राजीव सातव यांनी जलदिंडीत सर्व सहभागींचे अभिनंदन केले. कयाधू मुख्य नदी असून लोकसहभाग मिळाला तर नदी जिवंत होऊ शकते असे ते म्हणाले. केंद्रशासनाकडूनही या कामासाठी मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना खा. सातव म्हणाले प्रत्येकांनी दैनंदिन डायरी लिहिण्याचा सराव करावा. स्वत:चा गुरु हा स्वत:च असतो. डायरी लिहिण्याची सवय जडली तर आपण किती चुकलो किंवा यशस्वी झालो याचा अभ्यास करणे शक्य होते. त्यातून सुधारणाही करता येते असे त्यांनी सांगितले.आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले कयाधू नदी हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून वाहते. तसेच नदीचे खोरे हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. नदी जिवंत झाली तर बहुतांश कुटुंब सुखी होतील व शेतीविषयक समस्यांना आळा बसेल.उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले जल हे जीवन आहे, त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पाणी उपसा थांबवून पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.विभागीय वनाधिकारी केशवराव वाबळे म्हणाले पर्यावरण दिनाच्या निमिताने जलदिंडीचा समारोप होत आहे. परंतु प्रत्येकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे. तसेच रोपांची जोपासनाही करावी. जर जंगलाचे प्रमाण वाढले तर जमिनीतील पाणी पातळी वाढू शकेल. जैवविविधता टिकून राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना झाड वाटप करण्यात आले. उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईराव म्हणाले सर्व समस्यांचे मूळ हे पाणी आहे. जर पाणी नसले तर समस्या वाढतील आणि मानव विकास निर्देशांकही खालावला जाईल. त्यामुळे कयाधू नदीला पाझर फोडावा लागेल. त्यासाठी लोकांच्या मनात पाझर फोडणे गरजेचे आहे. शाहीर धम्मानंद इंगोले यांनी गीत सादरीकरणातून महत्त्व सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक