शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

By रमेश वाबळे | Updated: March 8, 2024 19:22 IST

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

हिंगोली : हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुभारंभाचा ७ मार्चचा मुहूर्त टळल्यानंतर आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिंगोली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली  आहे.

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनही करण्यात आली. तसेच रेल्वे राज्यमंत्र्यांसह केंद्रस्तरावर ही प्रयत्न झाले. अखेर या मागणीला यश आले असून, जनशताब्दीच्या हिंगोली पर्यंतच्या विस्ताराला रेल्वे विभागाने मंजुरी दिली. यामुळे हिंगोलीकरांना आता मुंबई सोयीचे होणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस शुभारंभाचा मुहूर्त ७ मार्च रोजी ठेवण्यात आला होता. मात्र, हा मुहूर्त टळला. आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. चंद्रकांत नवघरे, आ. प्रज्ञाताई सातव आदींची उपस्थिती राहणार आहे. ही रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकाहून वसमत, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईच्या दिशेने धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला एकूण २२ बोगी असून त्यामध्ये १९ बोगी जनरल राहणार आहेत तर एक वातानुकूलित राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

१० मार्चपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार ‘जनशताब्दी’..जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला असून, मुंबई गाठणे आता सोयीचे झाले आहे. ९ मार्च रोजी शुभारंभानंतर १० मार्चपासून ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. हिंगोली रेल्वे स्थानकाहून पहाटे ४:२० वाजता निघणार असून, सकाळी ९ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. तर दुपारी ४:५० वाजता सीएसटीएम (मुंबई) येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही रेल्वे सीएसटीएम (मुंबई) येथून दुपारी १२:१० वाजता सुटणार असून, रात्री ७:५० वाजता ती जालना येथे पोहोचणार आहे. तर रात्री १२:३० वाजता हिंगोली रेल्वेस्थानकावर येणार आहे.

डिझेलवरच धावणार ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’...रेल्वे विभागाच्या वतीने बहुतांश लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. हिंगोली ते पूर्णा सिग्नलपर्यंत हे काम पूर्ण झाले असून, काही काम शिल्लक आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस ही पूर्णापर्यंत डिझेलच्या इंजिनवर धावेल आणि पूर्णापासून पुढे विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हिंगोली ते मुंबई दरम्यान ही रेल्वेगाडी डिझेलवरील इंजिनवरच धावणार आहे. पूर्णा जवळील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी रेल्वे विजेवर चालणाऱ्या इंजिनवर धावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीHingoliहिंगोलीMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे