शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

By रमेश वाबळे | Updated: March 8, 2024 19:22 IST

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

हिंगोली : हिंगोली ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुभारंभाचा ७ मार्चचा मुहूर्त टळल्यानंतर आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिंगोली रेल्वेस्थानकावर हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली  आहे.

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनही करण्यात आली. तसेच रेल्वे राज्यमंत्र्यांसह केंद्रस्तरावर ही प्रयत्न झाले. अखेर या मागणीला यश आले असून, जनशताब्दीच्या हिंगोली पर्यंतच्या विस्ताराला रेल्वे विभागाने मंजुरी दिली. यामुळे हिंगोलीकरांना आता मुंबई सोयीचे होणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस शुभारंभाचा मुहूर्त ७ मार्च रोजी ठेवण्यात आला होता. मात्र, हा मुहूर्त टळला. आता ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा. हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. चंद्रकांत नवघरे, आ. प्रज्ञाताई सातव आदींची उपस्थिती राहणार आहे. ही रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकाहून वसमत, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईच्या दिशेने धावणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला एकूण २२ बोगी असून त्यामध्ये १९ बोगी जनरल राहणार आहेत तर एक वातानुकूलित राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

१० मार्चपासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार ‘जनशताब्दी’..जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला असून, मुंबई गाठणे आता सोयीचे झाले आहे. ९ मार्च रोजी शुभारंभानंतर १० मार्चपासून ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. हिंगोली रेल्वे स्थानकाहून पहाटे ४:२० वाजता निघणार असून, सकाळी ९ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. तर दुपारी ४:५० वाजता सीएसटीएम (मुंबई) येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात ही रेल्वे सीएसटीएम (मुंबई) येथून दुपारी १२:१० वाजता सुटणार असून, रात्री ७:५० वाजता ती जालना येथे पोहोचणार आहे. तर रात्री १२:३० वाजता हिंगोली रेल्वेस्थानकावर येणार आहे.

डिझेलवरच धावणार ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’...रेल्वे विभागाच्या वतीने बहुतांश लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. हिंगोली ते पूर्णा सिग्नलपर्यंत हे काम पूर्ण झाले असून, काही काम शिल्लक आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेस ही पूर्णापर्यंत डिझेलच्या इंजिनवर धावेल आणि पूर्णापासून पुढे विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हिंगोली ते मुंबई दरम्यान ही रेल्वेगाडी डिझेलवरील इंजिनवरच धावणार आहे. पूर्णा जवळील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी रेल्वे विजेवर चालणाऱ्या इंजिनवर धावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीHingoliहिंगोलीMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे