शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

वाढीव कर्जमाफी अजूनही बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:30 IST

कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा आदेश शासनाने काढल्यानंतरही त्याचा लाभ मात्र कुणाला मिळाला याचे काहीच गणित दिसत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा आदेश शासनाने काढल्यानंतरही त्याचा लाभ मात्र कुणाला मिळाला याचे काहीच गणित दिसत नाही. कदाचित पूर्वीचीच रक्कम मिळाली नसल्याने अनेकांनी नव्या निर्णयाचा लाभच घेतला नसल्याचे चित्र आहे.१0 आॅगस्ट २0१८ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या शासन निर्णयात कर्जमाफीच्या निर्णयात अंशत: बदल करून त्याची व्याप्ती वाढविली होती. यात सुरुवातीला दीड लाख मर्यादेपर्यंत ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्यांना प्रत्येक पात्र कुटुंबातील एका सदस्याला कर्जमाफी दिली होती. तर यापेक्षा जास्त कर्ज असल्यास त्यापुढील रक्कम भरूनही लाभ घेता येणार होता. मात्र नव्या निर्णयानंतर त्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यासही दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देता येणार आहे. त्यासाठी संबंधितांना कसा लाभ द्यावा हे उदाहरणासह परिशिष्ट अमध्ये नमूद केले आहे. जर थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी दीड लाखांवरील रक्कम भरून लाभ घेतला तर ती शासनाकडून परत करण्यात येईल, असे म्हटले होते. तर थकबाकी दीड लाखांच्या आत असल्यास आणि लागू असेल तेथे अशा सदस्यांकडील पुनर्गठित कर्जाची उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाखाच्या मर्यादेत लाभ देता येईल, असेही स्पष्टपणे म्हटले होते. तर अशा खातेदारांची नावे ज्या अर्जात असतील त्यात लाभार्थी क्रमांक एक व दोनबाबत कर्जमाफीचा लाभ देताना कोणती व कशी काळजी घ्यायची याची गणितीय माहितीही उदाहरणादाखल दिली. तरीही हिंगोली जिल्ह्यात अद्याप नव्या निकषाप्रमाणे कोणाला लाभ मिळाल्याचे चित्र दिसत नाही. यामागे नेमके कारण काय? हे न उलगडणारे कोडे आहे.कर्जमाफीच्या योजनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१७५८ लाभार्थ्यांना २७.४१ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकेच्या ३७१७८ जणांना १९२.११ कोटी, तर ग्रामीण बँकेच्या ८९६१ जणांना ४९.८९ कोटी अशा २६९ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. यापैकी ६२ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर २४८.३४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे बँकांकडून उपनिबंधक कार्यालयात सांगण्यात आले. यात जिमसचे २२.४६ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे १८९ कोटी तर ग्रामीण बँकांचे ३६.११ कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत.अजूनही ५७८१ जणांचे २१.0८ कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावयाचे बाकी आहेत. यात जिमसचे ३२४७, राष्ट्रीयीकृत बँकांचे २७८ तर ग्रामीण बँकेचे जवळपास २२५६ खातेदार आहेत. ग्रामीण बँकेच्या २५ टक्के लाभार्थ्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी