शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची गैरसोय; ऐन हंगामात ६०० कृषी सेवा केंद्र ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:19 IST

सुरूवातीपासूनच्या पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची वाढ जोमाने झाली आहे.

ठळक मुद्दे२३५ दुकानदारांची ‘रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट’ प्रक्रिया पूर्ण‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र आवश्यकच

हिंगोली : फुलधारणा झालेल्या तथा कळीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवरील किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषध फवारणी आवश्यक ठरत आहे. असे असताना खबरदारीचा उपाय म्हणून दुकानदार व नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ बंधनकारक करण्यात आल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र बंद आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून १० आॅगस्टपर्यंत २३५ दुकानदार व त्यांच्या नोकरांची टेस्ट करण्यात आली. त्यातील चारजण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. 

सुरूवातीपासूनच्या पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची वाढ जोमाने झाली आहे. सध्या सोयाबीनला फुलधारणा झाली असून बदलत्या वातावरणाचा फटका या पिकाला बसू शकतो. त्यामुळे येथून पुढचे १५ दिवस सोयाबीनची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विविध स्वरूपातील किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी रासायनिक औषध फवारणी करणे अत्यावश्यक ठरणार आहे. असे असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ६ आॅगस्टपासून १९ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू केली. यामुळे इतर दुकानांसोबतच कृषी सेवा केंद्रही बंद आहेत. संबंधित दुकानदारांनी स्वत:सोबतच दुकानात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करून घ्यावी. अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास तसे प्रमाणपत्र दुकानाच्या दर्शनी भागात लावावे. त्यानंतरच १२ आॅगस्टपासून दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

त्यानुसार, १० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी या तीन तालुक्यांमधील २३५ कृषी सेवा केंद्रांचे संचालक व त्यांच्या नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करण्यात आली. त्यात चारजण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले; मात्र उर्वरित २६५ पेक्षा अधिक दुकानदार व नोकरांची टेस्ट झालेली नव्हती. त्यामुळे सर्व ठिकाणचे कृषी सेवा केंद्र १२ आॅगस्ट रोजी सुरू होणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. अशास्थितीत खरीप हंगामातील सोयाबीनसह उडीद, मूग आणि अन्य पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढल्यास आणि वेळेवर फवारणीकरिता रासायनिक औषध उपलब्ध न झाल्यास काय करावे, या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. तथापि, प्रशासनाने ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ची गती वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे. 

‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र आवश्यकचयाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी चर्चा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक असलेल्या कृषी सेवा केंद्रांचे संचालक व त्यांच्या नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३५ दुकानदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून चार ‘पॉझिटिव्ह’चा अपवाद वगळता इतरांना तसे प्रमाणपत्र देण्यात आले, असे त्यांनी सांगितले.उर्वरित कृषी सेवा केंद्र संचालक व नोकरांची टेस्ट करून घेतली जात आहे. ‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकान सुरू करण्यास परवानगी नाही, असेही विजय लोखंडे यांनी सांगितले.

मूग, उडीद, सोयाबीन पिकांची सद्य:स्थितीमूग, उडीद - सुरूवातीला पेरणी केलेले मूग, उडीद हे पीक सध्या शेंगा धारणेच्या अवस्थेत असून मावा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा उपद्व्याप व वातावरणातील बदलामुळे तांबेरा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.सोयाबीन - सोयाबीन पीक फुल आणि कळीच्या अवस्थेत असून हिरवी उंटअळी आणि चक्रीभुंग्यांकडून नुकसान होण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी