शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

शेतकऱ्यांची गैरसोय; ऐन हंगामात ६०० कृषी सेवा केंद्र ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:19 IST

सुरूवातीपासूनच्या पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची वाढ जोमाने झाली आहे.

ठळक मुद्दे२३५ दुकानदारांची ‘रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट’ प्रक्रिया पूर्ण‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र आवश्यकच

हिंगोली : फुलधारणा झालेल्या तथा कळीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवरील किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषध फवारणी आवश्यक ठरत आहे. असे असताना खबरदारीचा उपाय म्हणून दुकानदार व नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ बंधनकारक करण्यात आल्याने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र बंद आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून १० आॅगस्टपर्यंत २३५ दुकानदार व त्यांच्या नोकरांची टेस्ट करण्यात आली. त्यातील चारजण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. 

सुरूवातीपासूनच्या पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची वाढ जोमाने झाली आहे. सध्या सोयाबीनला फुलधारणा झाली असून बदलत्या वातावरणाचा फटका या पिकाला बसू शकतो. त्यामुळे येथून पुढचे १५ दिवस सोयाबीनची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विविध स्वरूपातील किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी रासायनिक औषध फवारणी करणे अत्यावश्यक ठरणार आहे. असे असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ६ आॅगस्टपासून १९ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू केली. यामुळे इतर दुकानांसोबतच कृषी सेवा केंद्रही बंद आहेत. संबंधित दुकानदारांनी स्वत:सोबतच दुकानात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करून घ्यावी. अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास तसे प्रमाणपत्र दुकानाच्या दर्शनी भागात लावावे. त्यानंतरच १२ आॅगस्टपासून दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

त्यानुसार, १० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी या तीन तालुक्यांमधील २३५ कृषी सेवा केंद्रांचे संचालक व त्यांच्या नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करण्यात आली. त्यात चारजण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले; मात्र उर्वरित २६५ पेक्षा अधिक दुकानदार व नोकरांची टेस्ट झालेली नव्हती. त्यामुळे सर्व ठिकाणचे कृषी सेवा केंद्र १२ आॅगस्ट रोजी सुरू होणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. अशास्थितीत खरीप हंगामातील सोयाबीनसह उडीद, मूग आणि अन्य पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढल्यास आणि वेळेवर फवारणीकरिता रासायनिक औषध उपलब्ध न झाल्यास काय करावे, या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. तथापि, प्रशासनाने ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ची गती वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे. 

‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र आवश्यकचयाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी चर्चा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक असलेल्या कृषी सेवा केंद्रांचे संचालक व त्यांच्या नोकरांची ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३५ दुकानदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून चार ‘पॉझिटिव्ह’चा अपवाद वगळता इतरांना तसे प्रमाणपत्र देण्यात आले, असे त्यांनी सांगितले.उर्वरित कृषी सेवा केंद्र संचालक व नोकरांची टेस्ट करून घेतली जात आहे. ‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र असल्याशिवाय दुकान सुरू करण्यास परवानगी नाही, असेही विजय लोखंडे यांनी सांगितले.

मूग, उडीद, सोयाबीन पिकांची सद्य:स्थितीमूग, उडीद - सुरूवातीला पेरणी केलेले मूग, उडीद हे पीक सध्या शेंगा धारणेच्या अवस्थेत असून मावा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा उपद्व्याप व वातावरणातील बदलामुळे तांबेरा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.सोयाबीन - सोयाबीन पीक फुल आणि कळीच्या अवस्थेत असून हिरवी उंटअळी आणि चक्रीभुंग्यांकडून नुकसान होण्याचे संकेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी