शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

हिंगोलीत गोठे-घरे पेटवून दिल्याच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:01 AM

शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत तीन गुरे होरपळून जखमी झालीे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील बावनखोली येथील जनावारांचा गोठा व हातगाडा पेटवून दिल्याच्या दोन घटना १६ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास एकाच दिवशी घडल्या. गोठ्यास आग लागल्याने गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि वेळीच जाग आल्याने घरातील मंडळींनी आग आटोक्यात आणली. मात्र आगीत तीन गुरे होरपळून जखमी झालीे आहेत.बावनखोली येथील घराबाहेरील वस्तू, जनावरांचे गोठे पेटवून देण्याच्या घटना मागील दहा दिवसांपासून घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. १६ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बावनखोली येथील दुग्ध व्यवसायिक गोपाल गायकवाड यांचा गोठा कोणीतरी पेटवून दिला. जनावरांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांना वेळीच जाग आली. गायकवाड व त्यांच्या पत्नीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे गुरे वाचली व अधिक नुकसान टळले. परंतु गोठ्यातील जनावारांचा कडबा व इतर साहित्य जळून खाक झाले. याचदरम्यान गायकवाड यांच्या घरापासून काही अंतरावरच शेख रशीद शेख हमीद यांचाही कटलरीचा हातगाडा पेटवून दिल्याचे लक्षात आले. आगीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे.अशोक गादेकर यांच्या घरासमोरील खुर्च्या तर संजय इंगोले यांच्या घराला व गोठ्यासही आग लावण्याची घटना घडली होती. मागील दहा दिवसांत घरे, गोठे व बाहेरील वस्तू पेटवून देण्याच्या पाच घटना घडल्याचे नागरिक सांगत होते. वाढत्या घटनांमुळे अखेर नागरिकांनी पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार अर्ज दिला.केवळ ठरावीक भागातच घडत असलेल्या घटनांमुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. त्यामुळे पोलिसांना या घटनेच्या मुळाशी जाण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. तर या प्रकरणाचा तपासही गांभिर्याने न झाल्यास मोठा धोका उद्भवू शकतो.पोलिसांनी मंगळवारी १२.३० वाजता बावनखोली परिसरात जाऊन पाहणी केली. यावेळी गोठ्याचा पंचनामा पोलिसांनी केला. परंतु घरे, गोठे व घराबाहेरील वस्तंू कोण पेटवून देत आहे,याचा उलगडा मात्र झाला नाही. जाळपोळीच्या या घटना कोण घडवून आणत आहे, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सदर घटनेची नोंद ठाण्यात करण्यात आली असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, माहिती पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले. या प्रकारामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrimeगुन्हा