शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:33 IST

माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले आहेत. सेवाकाळात कर्जवसुलीची जबाबदारी पार पाडताना रागाचा अनुभवही आला आहे. बँकेची वसुली सक्तीने किंवा राग व्यक्त करून नाही तर गोडीने व युक्तीने केली पाहिजे. विशेष म्हणजे कर्तव्य बजावताना सेवाकाळात वरिष्ठांचे राग अनुभवल्याचे सी. एल. पठाण यांनी सांगितले. तसेच रागाला प्रेमाणे उत्तर दिल्यास राग करणारे अधिकारी पश्चातापाने व्यथीत होतात. बँकेतील कर्तव्य बजावत असताना कामचुकार करणारे प्रेमाच्या गोडव्याने जवळ येवून नतमस्तक झालेले मी पाहिले आहेत. राग व द्वेष मनात न आणल्यास कुठलीही कामे लवकर होतात. शिवाय अडथळ्यांनाही थारा नसतो. प्रत्येकांनी जर स्वभावात प्रेमाची सांगड घातल्यास जीवन सुखी समाधानी बनते.निवृत्तीनंतर अजूनही ग्रामीण शेतकरी वर्ग भेटतात. त्यावेळी त्यांचे प्रेम कुटूंबातील सदस्याप्रमाणे सुखदुखाच्या शब्दांनी भारावून जाणारे असते. त्यांच्या त्या प्रेमळ सहानुभूतीने मन आनंदून जाते. त्यामुळे प्रत्येकांनीच राग, अहंकार, द्वेष याला हद्दपार करून जीवन सुखीमय करावे. शिवाय प्रमेळ स्वभावामुळेच कर्तव्य पार पाडताना अडी-अडचणींचा सामना करावा लागला नाही.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक