शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मराठ्यांना ओबीसीत समावेशाचा कायदा पारित करा, अन्यथा सरकारला जड जाईल: मनोज जरांगे

By विजय पाटील | Updated: December 7, 2023 18:47 IST

जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल.

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या या लढ्याला तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच हलणार नाही. तुम्हीही एकजूट कायम ठेवा. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून कायदा पारित न केल्यास सरकारला जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथील सभेत दिला.

जरांगे म्हणाले, मराठ्यांना ओबीसींसोबत लढवण्याचा डाव आहे. मात्र त्यांच्यासोबतचे संबंध चांगले ठेवा. गाव पातळीवर ओबीसी व मराठा एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणारे आहेत. मात्र कुणी राजकीय फायद्यासाठी त्यांच्याशी संबंध बिघडवू पाहात असेल तर त्याला बळी पडू नका. 

आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नयेत. आपल्या कुटुंबाचा विचार करा, असे आवाहनही जरांगे यांनी केले. तर सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पाळले नाही. ३०७, १२० ब, ३५३ सारखे गुन्हे दाखल केले. एकट्या छगन भुजबळांच ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर सरकारला जड जाईल. ३५ लाख मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या. जवळपास दोन ते अडीच कोटी मराठ्यांना ओबीसीचा त्यामुळे लाभ मिळेल. उर्वरित मराठ्यांनाही आज ना उद्या ओबीसी आरक्षण मिळेल.

जरांगे पुढे म्हणाले, आमच्या लेकराबाळांच भविष्य या आरक्षणात अडकले आहे. माझा जीव गेला तरीही मी भीत नाही. हीच एक संधी आहे. राजकीय जोडे बाजूला काढा. पुढाऱ्यांना जातीपेक्षा मोठे मानू नका, एकजूट कायम ठेवा. शांततेने हा लढा जिंकू. जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. 

भुजबळांवर टीकाछगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी या सभेत जोरदार टीका केली. घटनेच्या सभागृहात बसतो अन् कायदा पायदळी तुडवतो. आता मराठ्यांच्या नादी लागलात तर अवघड आहे, असा इशारा दिला. काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याची भाषा केली जाते. हे तर आमच्या रक्तातच आहे, हे तुम्हाला माहिती नाही का?  असा सवाल केला. राजकीय व जातीय दंगली करण्याचे भुजबळांचे स्वप्न आहे. ते पूर्ण होवू देवू नका, असे आवाहन केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली