शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मी फेसबूक लाईव्ह नव्हे, तर फेस टू फेस भेटणारा मुख्यमंत्री - शिंदे

By विजय पाटील | Updated: March 10, 2024 19:02 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हिंगोली: घरातून काम करणारा, उंटावरून शेळ्या हाकणारा मी नाही. आपत्तीत थेट जनतेच्या दारी पोहोचणारा आहे. फेसबूक लाईव्ह करणारा नव्हे, तर जनतेची फेस टू फेस भेट घेणारा मुख्यमंत्री असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हिंगोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते आले होते. मंचावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, खा.हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजू नवघरे, आ. बालाजी कल्याणकर, माजी खा. शिवाजी माने, माजी आ.रामराव वडकुते, माजी आ.गजानन घुगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. त्याची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. राज्यात २२ कार्यक्रमांतून ५ कोटी ६५ लोकांना थेट लाभ दिला. त्यामुळे गेलो तेथे लोक प्रेम देतात. कामांचा एवढा धडाका आहे की, त्यासमोर महावलिकास आघाडीच्या लवंगी फटाक्याच्या आवाजच येत नाही.पूर्वी लोकांची कामे होत नसत त्यामुळे ते लाभाचा नादच सोडून द्यायचे. हे चित्र आता बदलले.मी स्वत:ला सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो. उद्या कोणीही सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल. ही काही कुणाची जहागिरी नाही. आम्ही सरकारमधून बाहेर पडलो कारण तेव्हा कामे होत नसल्याने आमदार, खासदारांत नैराश्य होते. मी मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यकर्त्यांसाठी नव्हे, तर सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. दुष्काळी मदतीचे निकष बदलले. दोनहून तीन हेक्टरला मदत देतो. त्यातही वाढ केली. महिलांना ५० टक्के तिकिटसवलत दिली. यामुळे एसटी फायद्यात आली, इतका लाभ महिलांनी घेतला. विरोधक म्हणतात की, उद्योग पळाले. गेल्यावर्षी १ लाख ६७ हजार कोटी तर यंदा ३ लाख ७३ हजार कोटींची उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक केली. राज्य पहिल्या नंबरवर आलयं.

मुख्यमंत्री शिंदे हिंगोली जिल्ह्याबाबत म्हणाले की, येथील सिंचनाचा अनुशेष दूर करू. हळद संशोधन केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय दिले आहे. कयाधूत टनेलने येलदरी व सिद्धेश्वरचे पाणी सोडण्याचा निर्णयही घेवू. इतर अनेक बाबींबात त्यांनी सकारात्मकता दाखविली.

टिकणारे मराठा आरक्षण दिलेमी छत्रपती शिवरायांची शपथ घेत आरक्षणाचा शब्द दिला होता. तो पाळला. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले होते. ते तसेच दिले. हे आरक्षण न्यायालयात का टिकणार नाही, हे विरोधकांनी सांगावे, ते कसे टिकेल हे मी सांगतो, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तर जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. नव्या आरक्षणानुसार भरतीही सुरू झाली. त्यातील उमेदवारांना भविष्यातही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.उबाठाचे लोक यावरुन राजकारण करीत आहेत. तसे चालत नाही, लोक समजदार असल्याचेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे