मानवांनो नुसते पाणवठे तयार करू नका; त्यात पाणीही टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:33+5:302021-03-23T04:31:33+5:30
हिंगोली : मनुष्य हा प्राणीमात्रावर दया करणारा समाजशील आहे. परंतु आज २३ दिवस झाले आहेत, आमच्यासाठी तयार केलेल्या पाणवठ्यात ...

मानवांनो नुसते पाणवठे तयार करू नका; त्यात पाणीही टाका
हिंगोली : मनुष्य हा प्राणीमात्रावर दया करणारा समाजशील आहे. परंतु आज २३ दिवस झाले आहेत, आमच्यासाठी तयार केलेल्या पाणवठ्यात कोणी थेंबभर पाणी टाकायलाही तयार नाही, असा सवाल पक्ष्यांनी उपस्थित केला आहे.
नगरपालिकेच्या वतीने वृक्षांवर मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करून १ मार्च रोजी पाणवठे उभारले. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले पाणवठे बांधले. या पाणवठ्यात जेमतेम दोन- तीन दिवस पाणी टाकले. नंतर मात्र याकडे कोणी पाहायलाही तयार नाही. आजमितीस २३ दिवस झाले आहेत. मोठ्या आशेने पक्षी मंडळी पाणवठ्याजवळ येत आहोत. परंतु त्यात पाणीच नसल्याने येेथे आलेल्या पक्ष्यांना पाण्याच्या शोधात इतरत्र उडून जावे लागते. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जीव कासावीस होत आहे. शहरातील झाडांवर आता नुसतेच काेरडे पाणवठे दिसून येत आहेत. झाडाला बांधलेल्या पाणवठ्यात ना दाणा, ना पाणी. केवळ पाणवठे शोभेच्या वस्तू झाल्या आहेत. पाणवठ्यात पाणी टाकण्याचा संकल्प करणे सोपे असते. परंतु तो पूर्ण करणे तेवढेचं जिकरीचे असते. यामुळे काही दिवस पाण्याची साेय केलेल्यां पक्ष्यांना परत दाणा, पाणी आहे की नाही, याची काेणालाही गरज नसल्याचे दिसून येतेे.
वाटसरुला आली दया...
नगर परिषदेच्या रोपवाटिकेने टाकाऊ वस्तूंपासून पाणवठे तयार केले. शहरातील रस्त्याच्या कडेला झाडावर पाणवठे बांधले आहेत. २१ मार्च रोजी टेलर शेख नईम नामक वाटसरु जात असताना, झाडांवर बांधलेले पाणवठे कोरडेठाक असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्याकडील पिण्याच्या बाटलीतील पाणी झाडांवर बांधलेल्या चार ते पाच पाणवठ्यात टाकून पक्ष्यांवरील प्रेम व्यक्त केले.
फाेटाे नं. ०१