शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

हिंगोलीकरांचे पाणी पळविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:09 IST

जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर होण्याची वेळ येताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सापळी धरणातून ३३ दलघमी पाणी उपलब्ध केल्याने नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष निर्माण होईल, अशी भीती दाखवत विरोध सुरू केला. हिंगोलीकरांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.

ठळक मुद्देमुटकुळे यांचा आरोपसिंचन अनुशेषाला चव्हाणांचा खोडा

हिंगोली : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर होण्याची वेळ येताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सापळी धरणातून ३३ दलघमी पाणी उपलब्ध केल्याने नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष निर्माण होईल, अशी भीती दाखवत विरोध सुरू केला. हिंगोलीकरांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर उपस्थित होते. आ.मुटकुळे म्हणाले, मी निवडून आल्यानंतर मागील चार वर्षांपासून हिंगोलीच्या सिंचन अनुशेषासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या त्यामुळे राज्यपालांनी १५ हेक्टरच्या सिंचन अनुशेषाला मंजुरी दिली आहे. सिंचन अनुशेषाच्या उपाययोजना सुरू होत असताना पाणी उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाली होती. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा केल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची फेररचना करण्यावर शिक्कामोर्तब झाले. यासाठी मुंबई व नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले. यानंतर सापळी धरणाचे पुनर्विलोकन व उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या फेरनियोजनासाठी झालेल्या बैठकीत जलविज्ञान प्रकल्प नाशिक यांनी केलेल्या अभ्यासानुसार सापळी धरणाच्या १९९ दलघमी मान्यताप्राप्त नियोजित पाणी वापरापैकी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष निर्मूलनार्थ आवश्यक ३३ दलघमी आता दिले. तर सापळी धरणाच्या वरच्या बाजूस यापूर्वी झालेल्या २८.४३ दलघमी अतिरिक्त पाणी वापरामुळे एकूण ६१.४३ दलघमीची तूट निर्माण होत असल्याने १९९ दलामी वापरातून कमी करून उक्त प्रयोजनार्थ उपलब्ध करून घेण्याबाबत तत्वत: मान्यता १८ मे रोजी देण्यात आली. यामुळे सिंचन अनुशेष दूर होण्यासाठी मोठी मदत होत होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सापळी धरणातून ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून देण्यास विरोध दर्शविला. यामुळे नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सिंचन अनुशेष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाणी उपलब्धता रद्द करण्याची मागणी केली. इसापूर व सापळी धरणाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही नवीन प्रकल्पास भविष्यात पाणी उपलब्धता न करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई