शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: खदानीत पडलेल्या शेळीला वाचविताना अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:29 IST

या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वसमत ( हिंगोली) : तालुक्यातील मुरुंबा शिवारात गायरान जमीनीवर असलेल्या खदानीत पडलेली शेळी काढतांना एका ५० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वसमत तालुक्यातील पळसगाव येथील नागोराव भगाजी पानधोंडे (५०) यांना दिड एकर शेती आहे. या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांनी सहा ते सात शेळ्या घेतल्या होत्या. नागोराव हे दररोज शेळ्या चारण्यासाठी जात होते. नेहमीप्रमाणे ८ ऑगस्ट रोजी सकाळी ते मुरूंबा शिवारात गायरान जमीनीवर शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास गायरान जमिनीवर असलेल्या खदाणीच्या पाण्यात एक शेळी पडली.या शेळीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नागोराव हे खदाणीच्या पाण्यात उतरले.मात्र खदाणीच्या खोल पाण्यात जाताच ते पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत एक जण होता त्याने घटलेल्या घटनेची माहिती पळसगाव येथे दिली. 

वसमत ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच. घटनास्थळी तहसिलदार शारदा दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे, साहेबराव चव्हाण, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोताखोर व पोलिसांनी मयत नागोराव यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ ज्ञानेश्वर पानधोंडे यांनी शुक्रवार रोजी रात्री दिलेल्या खबर वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पाश्चात्य आई,भाऊ,पत्नी व दोन मुले आहेत.या घटनेने पळसगावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी