शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत मिळाले २४ सौर कृषीपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:09 IST

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेत पहिल्या टप्प्यात दीड हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले असून त्यापैकी ११२६ जणांनी रक्कम महावितरणकडे जमा केली आहे.

हिंगोली : मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेत पहिल्या टप्प्यात दीड हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले असून त्यापैकी ११२६ जणांनी रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. यातील २४ जणांचे सौर कृषीपंप प्राप्त झाले आहेत. मात्र सीम नसल्याने ते अजून सुरू झाले नाहीत.महावितरणला वीजनिर्मितीत येणारी अडचण व शेतकऱ्यांना नवीन जोडणी देण्यासाठी येणारा भरमसाठ खर्च लक्षात घेता शासनाने सौर कृषी पंप योजना आणली आहे. या योजनेत तीन एचपीसाठी साधारणपणे साडेसोळा हजार तर पाच एचपीसाठी २४ हजारांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागत आहे. त्यात महावितरणकडून तो सौरपंप तसेच सौर उर्जा निर्मितीसाठीचे साहित्यही संबंधित शेतकºयांना पुरविले जाणार आहे. शासनाने यासाठी विविध कंपन्या नेमल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यासाठी पाच वेगवेगळ्या कंपन्यांची नेमणूक केली आहे. शेतकरी संबंधित कंपनीकडे थेट मागणी नोंदवू शकते.हिंगोली जिल्ह्यातून या योजनेत आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होती. जवळपास १३ हजार शेतकºयांनी अर्ज सादर केले होते. पहिल्या वर्षी यासाठी दीड हजार पंप पुरविण्याचे उद्दिष्ट आल्याने संबंधित शेतकºयांना कोटेशनची रक्कम भरण्यास सांगितली होती. यापैकी ११२६ शेतकºयांनी रक्कम भरली आहे. तर जवळपास ८0६ शेतकºयांचा कंपनी व महावितरणच्या अधिकाºयांनी संयुक्त सर्व्हे केला आहे. यामध्ये सर्वाधिक ४१६ जणांनी रवींद्र एनर्जी, ३९८ जणांनी टाटा पॉवर, २१८ जणांनी सीआरआय प्रा.लि., ८७ जणांनी जैन इरिेगेशन सिस्टम लि. तर ७ जणांना मुंदडा सोलार एनर्जी लि. यांच्या पंपासाठी नोंदणी केलेली होती. यात टाटाने २८६, सीआरआयने १८७, रवींद्र एनर्जीने २५0 तर जैन इरिगेशनने ८३ जणांचा संयुक्त सर्व्हे केला आहे. जवळपास ७0 ते ७५ शेतकºयांचे बोअर हे ३00 फुटांपेक्षा जास्त खोलीचे असल्याने अशांना तीनऐवजी पाच एचपीचा पंप लागणार आहे. त्यामुळे हा बदल करण्यासाठी महावितरणने वरिष्ठ स्तरावर हे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एरवी पाच एचपीचा पंप हा दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असल्यास मिळतो. काही शेतकºयांचे प्रस्ताव मात्र संयुक्त सर्व्हेमध्ये फेटाळले गेले आहेत. शाश्वत स्त्रोताची अडचण असल्याचे दिसून आले आहे.सीमसाठी पाठपुरावा सुरूजिल्ह्यात लवकरच सौर कृषीपंप बसविण्याचे काम सुरू होणार आहे. जवळपास २४ पंप प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. ते म्हणाले, हे पंप तूर्त प्रायोगिक तत्त्वावर आल्यासारखे आहेत.जोपर्यंत या पंपांसाठीचे सीम महावितरणकडून मिळणार नाही. तोपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होत नाही. पाच पंपांसाठी असे सीम उपलब्ध झाले आहेत. उर्वरित पंपांचे सीम अजून आले नाहीत. त्याचबरोबर इतर पंपांचे कामही याच कारणामुळे सध्या थांबले आहे.सौरपंपांचे सीम उपलब्ध होताच ही कामे अधिक गतीने पूर्ण केली जाणार आहेत. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार असून शेतकरी यातील कोटेशनची रक्कमही भरत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज