शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

हिंगोलीत मिळाले २४ सौर कृषीपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:09 IST

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेत पहिल्या टप्प्यात दीड हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले असून त्यापैकी ११२६ जणांनी रक्कम महावितरणकडे जमा केली आहे.

हिंगोली : मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेत पहिल्या टप्प्यात दीड हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले असून त्यापैकी ११२६ जणांनी रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. यातील २४ जणांचे सौर कृषीपंप प्राप्त झाले आहेत. मात्र सीम नसल्याने ते अजून सुरू झाले नाहीत.महावितरणला वीजनिर्मितीत येणारी अडचण व शेतकऱ्यांना नवीन जोडणी देण्यासाठी येणारा भरमसाठ खर्च लक्षात घेता शासनाने सौर कृषी पंप योजना आणली आहे. या योजनेत तीन एचपीसाठी साधारणपणे साडेसोळा हजार तर पाच एचपीसाठी २४ हजारांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागत आहे. त्यात महावितरणकडून तो सौरपंप तसेच सौर उर्जा निर्मितीसाठीचे साहित्यही संबंधित शेतकºयांना पुरविले जाणार आहे. शासनाने यासाठी विविध कंपन्या नेमल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यासाठी पाच वेगवेगळ्या कंपन्यांची नेमणूक केली आहे. शेतकरी संबंधित कंपनीकडे थेट मागणी नोंदवू शकते.हिंगोली जिल्ह्यातून या योजनेत आॅनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकºयांची मोठी गर्दी होती. जवळपास १३ हजार शेतकºयांनी अर्ज सादर केले होते. पहिल्या वर्षी यासाठी दीड हजार पंप पुरविण्याचे उद्दिष्ट आल्याने संबंधित शेतकºयांना कोटेशनची रक्कम भरण्यास सांगितली होती. यापैकी ११२६ शेतकºयांनी रक्कम भरली आहे. तर जवळपास ८0६ शेतकºयांचा कंपनी व महावितरणच्या अधिकाºयांनी संयुक्त सर्व्हे केला आहे. यामध्ये सर्वाधिक ४१६ जणांनी रवींद्र एनर्जी, ३९८ जणांनी टाटा पॉवर, २१८ जणांनी सीआरआय प्रा.लि., ८७ जणांनी जैन इरिेगेशन सिस्टम लि. तर ७ जणांना मुंदडा सोलार एनर्जी लि. यांच्या पंपासाठी नोंदणी केलेली होती. यात टाटाने २८६, सीआरआयने १८७, रवींद्र एनर्जीने २५0 तर जैन इरिगेशनने ८३ जणांचा संयुक्त सर्व्हे केला आहे. जवळपास ७0 ते ७५ शेतकºयांचे बोअर हे ३00 फुटांपेक्षा जास्त खोलीचे असल्याने अशांना तीनऐवजी पाच एचपीचा पंप लागणार आहे. त्यामुळे हा बदल करण्यासाठी महावितरणने वरिष्ठ स्तरावर हे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एरवी पाच एचपीचा पंप हा दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असल्यास मिळतो. काही शेतकºयांचे प्रस्ताव मात्र संयुक्त सर्व्हेमध्ये फेटाळले गेले आहेत. शाश्वत स्त्रोताची अडचण असल्याचे दिसून आले आहे.सीमसाठी पाठपुरावा सुरूजिल्ह्यात लवकरच सौर कृषीपंप बसविण्याचे काम सुरू होणार आहे. जवळपास २४ पंप प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. ते म्हणाले, हे पंप तूर्त प्रायोगिक तत्त्वावर आल्यासारखे आहेत.जोपर्यंत या पंपांसाठीचे सीम महावितरणकडून मिळणार नाही. तोपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होत नाही. पाच पंपांसाठी असे सीम उपलब्ध झाले आहेत. उर्वरित पंपांचे सीम अजून आले नाहीत. त्याचबरोबर इतर पंपांचे कामही याच कारणामुळे सध्या थांबले आहे.सौरपंपांचे सीम उपलब्ध होताच ही कामे अधिक गतीने पूर्ण केली जाणार आहेत. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार असून शेतकरी यातील कोटेशनची रक्कमही भरत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज