शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हिंगोलीत औषधी तुटवडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:00 IST

जिल्हा रूग्णालयात येणा-या रूग्णांची तपासणी जरी होत असली तरी, औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे रूग्णांना थेट बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देरूग्णांचे हाल, बाहेरून औषधी आणण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालय औषधी तुटवड्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. वातावरणातील बदलामुळे विविध आजार जडत आहेत, असे डॉक्टरांतून सांगितले जात आहे. मात्र जिल्हा रूग्णालयात येणा-या रूग्णांची तपासणी जरी होत असली तरी, औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे रूग्णांना थेट बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे.हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात विविध आजारांच्या निम्म्या औषधी उपलब्ध नाहीत. रूग्णांच्या हातावर प्रत्येकांना केवळ चार गोळ्या देऊन सोपस्कार कार्यक्रम केला जात आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांतून संताप व्यक्त केला जात आहे. बाहेरून औषधी आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रूग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांना औषधी तुटवड्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दोन दिवसांत औषधीपुरवठा उपलब्ध होणार आहे. शिवाय अत्यावश्यक औषधीसंदर्भात संबंधित विभागाला त्या उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. उपचारासाठी आलेल्या रूग्णांची तपासणी केली जात आहे. मात्र औषधी मात्र तुटवडा आहे, असेही त्यांनी सांगितले.औषधी पेढीत आलेल्या रूग्णांच्या हातावर केवळ चार गोळ्या थोपविल्या जात आहेत. ज्या औषधी उपलब्ध नाहीत, त्याच्यासमोर स्टार असे चिन्ह केले जात आहे. म्हणजेच ती औषधी उपलब्ध नसून रूग्णांनी बाहेरून खरेदी करायची आहे. मागील अनेक महिन्यांपासून रूग्णालयातील औषधी तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे उपचारासाठी येणा-या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. खोकला, सर्दी, ताप, यासह विविध आजार जडत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. औषधी विभागातील संबंधित अधिकाºयास विचारले असता ते म्हणाले, सध्या स्थानिक खरेदीवर आवश्यक औषध उपलब्ध करून घेत आहोत. औषधी टेंडरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे, लवकरच औषधसाठा प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीरजिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. पिण्याचे पाणी नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना जवळपास फिरून हॉटेलवरून पाणी आणावे लागते. मागील अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. वारंवार पाईपलाईन फुटल्याने वेळेवर जोडणी केली जात नसल्याचे चित्र आहे. जवळच पाणपोईची सुविधा आहे. लोकसहभागातून ही पाणपोई सुरू असते. परंतु सध्या तीही बंद आहे. त्यामुळे रूग्णांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. तर रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.उपचारासाठी रूग्णालयात येताय ? सोबत पंखा घेऊन या !जिल्हा रूग्णालयातील निम्मे पंखे बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होतो. परंतु वार्डातील निम्मे पंखे बंद असल्यामुळे रूग्णाचे नातेवाई चक्क सोबतच पंखे घेऊन येत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचा कारभार वा-यावरच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय जिल्हा रूग्णायालत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृह, परिसरात अस्वच्छता यासह विविध समस्यांचा सामना रूग्ण व सोबतच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक मात्र अजूनही रूग्णालयाला शिस्त लावण्याचा व नियोजनाचाच आराखडा तयार करीत आहेत, हे विशेष.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealthआरोग्य