शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हिंगोलीत औषधी तुटवडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:00 IST

जिल्हा रूग्णालयात येणा-या रूग्णांची तपासणी जरी होत असली तरी, औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे रूग्णांना थेट बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देरूग्णांचे हाल, बाहेरून औषधी आणण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालय औषधी तुटवड्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. वातावरणातील बदलामुळे विविध आजार जडत आहेत, असे डॉक्टरांतून सांगितले जात आहे. मात्र जिल्हा रूग्णालयात येणा-या रूग्णांची तपासणी जरी होत असली तरी, औषधी उपलब्ध नाही, त्यामुळे रूग्णांना थेट बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे.हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात विविध आजारांच्या निम्म्या औषधी उपलब्ध नाहीत. रूग्णांच्या हातावर प्रत्येकांना केवळ चार गोळ्या देऊन सोपस्कार कार्यक्रम केला जात आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांतून संताप व्यक्त केला जात आहे. बाहेरून औषधी आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रूग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांना औषधी तुटवड्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दोन दिवसांत औषधीपुरवठा उपलब्ध होणार आहे. शिवाय अत्यावश्यक औषधीसंदर्भात संबंधित विभागाला त्या उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. उपचारासाठी आलेल्या रूग्णांची तपासणी केली जात आहे. मात्र औषधी मात्र तुटवडा आहे, असेही त्यांनी सांगितले.औषधी पेढीत आलेल्या रूग्णांच्या हातावर केवळ चार गोळ्या थोपविल्या जात आहेत. ज्या औषधी उपलब्ध नाहीत, त्याच्यासमोर स्टार असे चिन्ह केले जात आहे. म्हणजेच ती औषधी उपलब्ध नसून रूग्णांनी बाहेरून खरेदी करायची आहे. मागील अनेक महिन्यांपासून रूग्णालयातील औषधी तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे उपचारासाठी येणा-या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. खोकला, सर्दी, ताप, यासह विविध आजार जडत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. औषधी विभागातील संबंधित अधिकाºयास विचारले असता ते म्हणाले, सध्या स्थानिक खरेदीवर आवश्यक औषध उपलब्ध करून घेत आहोत. औषधी टेंडरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे, लवकरच औषधसाठा प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीरजिल्हा रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. पिण्याचे पाणी नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना जवळपास फिरून हॉटेलवरून पाणी आणावे लागते. मागील अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. वारंवार पाईपलाईन फुटल्याने वेळेवर जोडणी केली जात नसल्याचे चित्र आहे. जवळच पाणपोईची सुविधा आहे. लोकसहभागातून ही पाणपोई सुरू असते. परंतु सध्या तीही बंद आहे. त्यामुळे रूग्णांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. तर रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.उपचारासाठी रूग्णालयात येताय ? सोबत पंखा घेऊन या !जिल्हा रूग्णालयातील निम्मे पंखे बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होतो. परंतु वार्डातील निम्मे पंखे बंद असल्यामुळे रूग्णाचे नातेवाई चक्क सोबतच पंखे घेऊन येत आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचा कारभार वा-यावरच सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय जिल्हा रूग्णायालत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृह, परिसरात अस्वच्छता यासह विविध समस्यांचा सामना रूग्ण व सोबतच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक मात्र अजूनही रूग्णालयाला शिस्त लावण्याचा व नियोजनाचाच आराखडा तयार करीत आहेत, हे विशेष.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealthआरोग्य