शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

उकाड्याने हैराण चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 12:04 IST

उकाड्याने हैराण झाल्याने पाणी अंगावर घेत असताना अंगणातील टाकीत पडून एक ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माथा या गावी घडली.

औंढा नागनाथ (हिंगोली ) : उकाड्याने हैराण झाल्याने कपाने पाणी अंगावर घेत असताना अंगणातील टाकीत पडून एक ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माथा या गावी घडली. जिल्ह्यातील कुरुंदा या गावात गुरुवारी बादलीत बुडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ही दुसरी दुखद घटना समोर आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील माथा येथील शेतकरी दत्तराव कुटे यांची गावाजवळच शेती आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी आणि ते शेतात कामानिमित्त गेले. यामुळे त्यांची ५ वर्षीय मुलगी सपना एकटीच घरी होती. दरम्यान उन्हात वाढ झाल्याने सपना उकाड्याने हैराण झाली. यावर उपाय म्हणून ती अंगणात अर्धवट अवस्थेत गाडलेल्या टाकीतील पाणी कपाने अंगावर घेत होती. टाकीत पाणी कमी असल्याने तिच्या हातास पाणी लागत नव्हते, यामुळे ती टाकीत झुकून पाणी काढत होती. या दरम्यान तिचा तोल जाऊन ती टाकीत पडली. ती सरळ डोक्यावर पाण्यात पडल्याने तिच्या नाकातोंडात पाणी गेले.

संध्याकाळी तिची आई घरी आली असता तिला सपना कुठे दिसत नव्हती. आजूबाजूला शोध घेतला असता अंगणातल्या टाकीतील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सपना आढळून आली. हे पाहताच तिच्या आईने एकच हंबरडा फोडला. तिला लागलीच  औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

कुरुंद्याची घटना कोठारी येथील ग्रामपंचायतीचे सेवक विश्वनाथ नरवाडे हे वसमत शहरात मालेगाव मार्गावरील  पेट्रोलपंपच्या बाजूला बंडू मगर यांच्याकडे भाड्याने राहतात. मगर हे नरवाडे यांचे पाहुणेच आहेत.  नरवाडे यांची पत्नीही ग्रामपंचायतीत कंत्राटी आॅपरेटर आहे.  कामानिमित्त वारंवार वसमतला यावे लागते, म्हणून ते तेथेच वास्तव्याला आले होते. शहराचा नवीन भाग असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक मिळेल त्या भांड्यात पाणी साठवून ठेवतात.  नरवाडे यांच्या घरीदेखील असेच भांड्यांमध्ये पाणी ठेवलेले होते.

धनश्री खेळत खेळत पाणी भरलेल्या बादलीजवळ गेली. काही वेळ तिने यातील पाण्यासोबत खेळलेदेखील. खेळत असतानाच ती  या बादलीत पडली. डोके खाली आणि पाय वर झाले. नाका, तोंडात पाणी गेल्याने तिचा जागीच मृृत्यू झाला.  घरचे इतर कामात गुंतलेले असल्याने व ती पाण्याशी खेळत असल्याचे समजून त्यांचे लक्ष गेले नाही. तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पालकांनी हंबरडा फोडला. नंतर लगेच कोठारी गाव गाठले. या घटनेमुळे कोठारी गावावर शोककळा पसरली आहे. मयत चिमुकलीवर कोठारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीHingoliहिंगोली