शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी सरासरी ५५ मिमी पर्जन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय ...

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पर्जन्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण सरासरीच्या ४३.८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली ३९.५७ टक्के, कळमनुरी ४६.२७, वसमत ४०.७१, औंढा ५३.७२ तर सेनगावात ४०.८३ टक्के पर्जन्य झाले आहे. औंढा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस पहिल्या दीड महिन्यातच झाल्याचे दिसत आहे.

कालच्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी पिके खरडून गेली. नदी व नाल्याकाठच्या शेतीला फटका बसला. अनेकांच्या शेतातही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

मंडलनिहाय असे झाले पर्जन्य

हिंगोली तालुक्यात हिंगोली ५३.५ मिमी, नर्सी ५१.८, सिरसम ३५.५, बासंबा ६२.५, डिग्रस कऱ्हाळे ७७.३, माळहिवरा ४१.५, खांबाळा ६०.५, कळमनुरी ४७.५, वाकोडी २७, नांदापूर ५७.८, आखाडा बाळापूर ५७.३, डोंगरकडा ६९.५, वारंगा फाटा ६१, वसमत ८२.५, आंबा ६९.३, हयातनगर ६५, हट्टा ७३, टेंभुर्णी ६०, कुरुंदा ७०.८, औंढा ६८, येहळेगाव सोळंके ६८.३, साळणा ५६.३, जवळा बाजार ७३.५, सेनगाव ४३.३, गोरेगाव ३६.५, आजेगाव ४१.३, साखरा २३.३, पानकनेरगाव ४१, हत्ता ३.५ मिमी अशी मंडलनिहाय पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

समग्याचा पूल गेला वाहून

हिंगोली : येथून जवळच असलेल्या समगा येथील पूल पुन्हा पावसामुळे तुटल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये हे नुकसान झाले आहे.

कयाधू नदीवर असलेल्या या पुलावरून समगा गावात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीला मोठा पूर आला तर या पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र मागील काही वर्षांपासून या नदीला पूर आला की पूल तुटत आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. आता पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.

तिघांचा वाहून गेल्याने मृत्यू

या पावसाने तिघांचा बळी घेतला. वसमत तालुक्यातील अकोलीवरून वसमतकडे परतणारा नीलेश बच्छेवार हा तरुण काल सायंकाळी वाहून गेला. तर औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील पुलावरून चारचाकी वाहून गेल्याने वर्षा पडोळ व श्रेयश पडोळ या मायलेकाचा मृत्यू झाला. यात रामदास शेळके व योगेश शेळके हे बचावले.

सकाळी भूकंप, सायंकाळी अतिवृष्टी

औंढा व वसमत तालुक्यातील जनतेला सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हैराण केले, तर सायंकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी फटकाच बसला. काही काळातच जास्त पर्जन्य झाल्याने ढगफुटीचा अनुभव आला. यात शेतीचे नुकसान झाले.