शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी सरासरी ५५ मिमी पर्जन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय ...

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पर्जन्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण सरासरीच्या ४३.८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली ३९.५७ टक्के, कळमनुरी ४६.२७, वसमत ४०.७१, औंढा ५३.७२ तर सेनगावात ४०.८३ टक्के पर्जन्य झाले आहे. औंढा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस पहिल्या दीड महिन्यातच झाल्याचे दिसत आहे.

कालच्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी पिके खरडून गेली. नदी व नाल्याकाठच्या शेतीला फटका बसला. अनेकांच्या शेतातही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

मंडलनिहाय असे झाले पर्जन्य

हिंगोली तालुक्यात हिंगोली ५३.५ मिमी, नर्सी ५१.८, सिरसम ३५.५, बासंबा ६२.५, डिग्रस कऱ्हाळे ७७.३, माळहिवरा ४१.५, खांबाळा ६०.५, कळमनुरी ४७.५, वाकोडी २७, नांदापूर ५७.८, आखाडा बाळापूर ५७.३, डोंगरकडा ६९.५, वारंगा फाटा ६१, वसमत ८२.५, आंबा ६९.३, हयातनगर ६५, हट्टा ७३, टेंभुर्णी ६०, कुरुंदा ७०.८, औंढा ६८, येहळेगाव सोळंके ६८.३, साळणा ५६.३, जवळा बाजार ७३.५, सेनगाव ४३.३, गोरेगाव ३६.५, आजेगाव ४१.३, साखरा २३.३, पानकनेरगाव ४१, हत्ता ३.५ मिमी अशी मंडलनिहाय पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

समग्याचा पूल गेला वाहून

हिंगोली : येथून जवळच असलेल्या समगा येथील पूल पुन्हा पावसामुळे तुटल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये हे नुकसान झाले आहे.

कयाधू नदीवर असलेल्या या पुलावरून समगा गावात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीला मोठा पूर आला तर या पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र मागील काही वर्षांपासून या नदीला पूर आला की पूल तुटत आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. आता पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.

तिघांचा वाहून गेल्याने मृत्यू

या पावसाने तिघांचा बळी घेतला. वसमत तालुक्यातील अकोलीवरून वसमतकडे परतणारा नीलेश बच्छेवार हा तरुण काल सायंकाळी वाहून गेला. तर औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील पुलावरून चारचाकी वाहून गेल्याने वर्षा पडोळ व श्रेयश पडोळ या मायलेकाचा मृत्यू झाला. यात रामदास शेळके व योगेश शेळके हे बचावले.

सकाळी भूकंप, सायंकाळी अतिवृष्टी

औंढा व वसमत तालुक्यातील जनतेला सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हैराण केले, तर सायंकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी फटकाच बसला. काही काळातच जास्त पर्जन्य झाल्याने ढगफुटीचा अनुभव आला. यात शेतीचे नुकसान झाले.