शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी सरासरी ५५ मिमी पर्जन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय ...

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पर्जन्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण सरासरीच्या ४३.८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली ३९.५७ टक्के, कळमनुरी ४६.२७, वसमत ४०.७१, औंढा ५३.७२ तर सेनगावात ४०.८३ टक्के पर्जन्य झाले आहे. औंढा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस पहिल्या दीड महिन्यातच झाल्याचे दिसत आहे.

कालच्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी पिके खरडून गेली. नदी व नाल्याकाठच्या शेतीला फटका बसला. अनेकांच्या शेतातही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

मंडलनिहाय असे झाले पर्जन्य

हिंगोली तालुक्यात हिंगोली ५३.५ मिमी, नर्सी ५१.८, सिरसम ३५.५, बासंबा ६२.५, डिग्रस कऱ्हाळे ७७.३, माळहिवरा ४१.५, खांबाळा ६०.५, कळमनुरी ४७.५, वाकोडी २७, नांदापूर ५७.८, आखाडा बाळापूर ५७.३, डोंगरकडा ६९.५, वारंगा फाटा ६१, वसमत ८२.५, आंबा ६९.३, हयातनगर ६५, हट्टा ७३, टेंभुर्णी ६०, कुरुंदा ७०.८, औंढा ६८, येहळेगाव सोळंके ६८.३, साळणा ५६.३, जवळा बाजार ७३.५, सेनगाव ४३.३, गोरेगाव ३६.५, आजेगाव ४१.३, साखरा २३.३, पानकनेरगाव ४१, हत्ता ३.५ मिमी अशी मंडलनिहाय पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

समग्याचा पूल गेला वाहून

हिंगोली : येथून जवळच असलेल्या समगा येथील पूल पुन्हा पावसामुळे तुटल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये हे नुकसान झाले आहे.

कयाधू नदीवर असलेल्या या पुलावरून समगा गावात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीला मोठा पूर आला तर या पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र मागील काही वर्षांपासून या नदीला पूर आला की पूल तुटत आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. आता पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.

तिघांचा वाहून गेल्याने मृत्यू

या पावसाने तिघांचा बळी घेतला. वसमत तालुक्यातील अकोलीवरून वसमतकडे परतणारा नीलेश बच्छेवार हा तरुण काल सायंकाळी वाहून गेला. तर औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील पुलावरून चारचाकी वाहून गेल्याने वर्षा पडोळ व श्रेयश पडोळ या मायलेकाचा मृत्यू झाला. यात रामदास शेळके व योगेश शेळके हे बचावले.

सकाळी भूकंप, सायंकाळी अतिवृष्टी

औंढा व वसमत तालुक्यातील जनतेला सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हैराण केले, तर सायंकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी फटकाच बसला. काही काळातच जास्त पर्जन्य झाल्याने ढगफुटीचा अनुभव आला. यात शेतीचे नुकसान झाले.