शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी सरासरी ५५ मिमी पर्जन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय ...

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ५४.७० मिमी, कळमनुरी ५३.४० मिमी, वसमत ७० मिमी, औंढा ६५.५० मिमी, सेनगाव ३३.२० मिमी अशी तालुकानिहाय सरासरी पर्जन्याची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण सरासरीच्या ४३.८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली ३९.५७ टक्के, कळमनुरी ४६.२७, वसमत ४०.७१, औंढा ५३.७२ तर सेनगावात ४०.८३ टक्के पर्जन्य झाले आहे. औंढा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा पाऊस पहिल्या दीड महिन्यातच झाल्याचे दिसत आहे.

कालच्या पावसाने जिल्ह्यातील विविध भागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी पिके खरडून गेली. नदी व नाल्याकाठच्या शेतीला फटका बसला. अनेकांच्या शेतातही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

मंडलनिहाय असे झाले पर्जन्य

हिंगोली तालुक्यात हिंगोली ५३.५ मिमी, नर्सी ५१.८, सिरसम ३५.५, बासंबा ६२.५, डिग्रस कऱ्हाळे ७७.३, माळहिवरा ४१.५, खांबाळा ६०.५, कळमनुरी ४७.५, वाकोडी २७, नांदापूर ५७.८, आखाडा बाळापूर ५७.३, डोंगरकडा ६९.५, वारंगा फाटा ६१, वसमत ८२.५, आंबा ६९.३, हयातनगर ६५, हट्टा ७३, टेंभुर्णी ६०, कुरुंदा ७०.८, औंढा ६८, येहळेगाव सोळंके ६८.३, साळणा ५६.३, जवळा बाजार ७३.५, सेनगाव ४३.३, गोरेगाव ३६.५, आजेगाव ४१.३, साखरा २३.३, पानकनेरगाव ४१, हत्ता ३.५ मिमी अशी मंडलनिहाय पावसाची नोंद झाली आहे. दहा मंडलामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

समग्याचा पूल गेला वाहून

हिंगोली : येथून जवळच असलेल्या समगा येथील पूल पुन्हा पावसामुळे तुटल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामध्ये हे नुकसान झाले आहे.

कयाधू नदीवर असलेल्या या पुलावरून समगा गावात जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. नदीला मोठा पूर आला तर या पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र मागील काही वर्षांपासून या नदीला पूर आला की पूल तुटत आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. आता पहिल्याच मोठ्या पुरात हा पूल तुटल्यामुळे यापुढील पावसात उर्वरित पूलही वाहून जाणार असे दिसते. त्यामुळे या गावाला पुन्हा पुलासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पुलाची उंची वाढवून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी होत आहे.

तिघांचा वाहून गेल्याने मृत्यू

या पावसाने तिघांचा बळी घेतला. वसमत तालुक्यातील अकोलीवरून वसमतकडे परतणारा नीलेश बच्छेवार हा तरुण काल सायंकाळी वाहून गेला. तर औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथील पुलावरून चारचाकी वाहून गेल्याने वर्षा पडोळ व श्रेयश पडोळ या मायलेकाचा मृत्यू झाला. यात रामदास शेळके व योगेश शेळके हे बचावले.

सकाळी भूकंप, सायंकाळी अतिवृष्टी

औंढा व वसमत तालुक्यातील जनतेला सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हैराण केले, तर सायंकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी फटकाच बसला. काही काळातच जास्त पर्जन्य झाल्याने ढगफुटीचा अनुभव आला. यात शेतीचे नुकसान झाले.