शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:06 IST

निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.पुढच्या वर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नवीन मतदार नोंदणी व पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, मतदारांना सुकर व्हावे, यासाठी योग्य मतदारसंख्या निश्चित करण्यासाठी ही विभागणी केली. हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात १४00 मतदारांमागे एक तर शहरी भागात १२00 मागे एक मतदान केंद्र देण्यात आले आहे. यापूर्वी काही मतदान केंद्रांवर तर सतराशेपेक्षाही जास्त मतदार झाल्याने मतदारांची अडचण होत होती. अशा ठिकाणी आता सुरळीतपणा येणार आहे.या नव्या निर्णयात हिंगोली विधानसभेअंतर्गत १३, वसमतअंतर्गत ८ तर कळमनुरीअंतर्गत ९ मतदान केंद्र वाढले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २२ तर शहरी भागातील ८ मतदान केंद्र वाढले आहेत. याबाबतच्या सर्वेक्षणानंतर प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली असल्याने आता वाढीव मतदान केंद्रांवर शिक्कामोर्तब झाले आहे.पुनरिक्षण कार्यक्रमआता पुढील निवडणुकीपूर्वीचा बहुदा अंतिम मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम १ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबरदरम्यान पात्र नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारणे, ३0 नोव्हेंबरपूर्वी हे दावे निकाली काढणे, डाटाबेसचे अद्ययावतीकरण करून पुरवणी याद्या ३ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करणे, ४ जानेवारीला अंतिम प्रसिद्धी देणे असा हा कार्यक्रम आहे.वसमत विधानसभा मतदार संघात आता ३२२ मतदान केंद्र राहणार असून २.८0 लाख मतदार आहेत. यात १.४६ लाख पुरुष तर १.३४ लाख स्त्री मतदार आहेत. कळमनुरी मतदारसंघात आता ३४५ मतदान केंद्र झाले असून मतदारसंख्या २.९४ लाख झाली. यात १.५५ लाख पुरुष तर १.३९ लाख स्त्री मतदारांचा समावेश आहे. हिंगोलीत ३३४ मतदान केंद्र राहणार असून २.९९ लाख मतदार आहेत. यात १.५७ लाख स्त्री तर १.४२ हजार पुरुष मतदार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीकर यांनी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक