शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

द्वेष केल्याने माणूस माणसांपासून तुटतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:51 IST

राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद्योजक ज्ञानेश्वर मामडे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद्योजक ज्ञानेश्वर मामडे यांनी व्यक्त केले.उद्योग करताना व्यवहार नित्याचेच असतात. अनेकजण नकारात्मक बोलतात, ते बोल डोक्यात न ठेवता तेव्हाच काढून टाकलेले कधीही चांगले. एखादा नकारात्मक विचार जितका जास्त वेळ डोक्यात ठेऊ तितकी जास्त पीडा सहन करावी लागते. त्यामुळे नकारात्मक विचाराला जितक्या लवकर बाजूला सारले तितके प्रसन्न जीवन जगता येईल.चूक प्रत्येकाकडून होते. चूक झाल्यास त्याला अपमानित न करता गोड शब्दात समजावून सांगितल्यास तो माणूस दुसऱ्यांदा ती चूक करत नाही. काम अधिक चांगले करण्याचा तो प्रयत्न करतो. पण चुकीबद्दल त्याला अपमानित केल्यास तो दुसºयांदा ते काम करण्यास धजावत नाही.कोणत्याही बाबीचा शेवट कधीच नसतो. त्यावर विचार केल्यास त्यातून सकारात्मक परिणाम दिसून येतात. चर्चा करुन दोघांनी वाटाघाटी केल्यास संबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून राग जिथल्या तिथे बाजूला सारून नव्या उमेदीने काम केल्यास जीवन अधिक समृद्ध जगता येते, असे स्वअनुभवातून वाटते.रागात बोलल्याने अनेक वर्षे सोबत काम केलेला माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा अंत:करण अतिशय जड होते. नातेसंबंध जपण्यासाठी रागाचा त्याग करुन सर्वांशी गोड बोलने गरजेचे आहे. लोकमतचा गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सर्वांनी अंगिकारण्याची गरज आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक