शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

द्वेष केल्याने माणूस माणसांपासून तुटतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:51 IST

राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद्योजक ज्ञानेश्वर मामडे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद्योजक ज्ञानेश्वर मामडे यांनी व्यक्त केले.उद्योग करताना व्यवहार नित्याचेच असतात. अनेकजण नकारात्मक बोलतात, ते बोल डोक्यात न ठेवता तेव्हाच काढून टाकलेले कधीही चांगले. एखादा नकारात्मक विचार जितका जास्त वेळ डोक्यात ठेऊ तितकी जास्त पीडा सहन करावी लागते. त्यामुळे नकारात्मक विचाराला जितक्या लवकर बाजूला सारले तितके प्रसन्न जीवन जगता येईल.चूक प्रत्येकाकडून होते. चूक झाल्यास त्याला अपमानित न करता गोड शब्दात समजावून सांगितल्यास तो माणूस दुसऱ्यांदा ती चूक करत नाही. काम अधिक चांगले करण्याचा तो प्रयत्न करतो. पण चुकीबद्दल त्याला अपमानित केल्यास तो दुसºयांदा ते काम करण्यास धजावत नाही.कोणत्याही बाबीचा शेवट कधीच नसतो. त्यावर विचार केल्यास त्यातून सकारात्मक परिणाम दिसून येतात. चर्चा करुन दोघांनी वाटाघाटी केल्यास संबंध अधिक दृढ होतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून राग जिथल्या तिथे बाजूला सारून नव्या उमेदीने काम केल्यास जीवन अधिक समृद्ध जगता येते, असे स्वअनुभवातून वाटते.रागात बोलल्याने अनेक वर्षे सोबत काम केलेला माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा अंत:करण अतिशय जड होते. नातेसंबंध जपण्यासाठी रागाचा त्याग करुन सर्वांशी गोड बोलने गरजेचे आहे. लोकमतचा गुड बोला, गोड बोला हा उपक्रम सर्वांनी अंगिकारण्याची गरज आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक