बाजारपेठेत जाताय मोबाइल सांभाळा; महिन्यात दहा तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:43+5:302021-07-07T04:36:43+5:30

हिंगोली : शहरातील गांधी चौक बाजार, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात जाताय तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा, अशी ...

Handle mobiles as they go to market; Ten complaints a month | बाजारपेठेत जाताय मोबाइल सांभाळा; महिन्यात दहा तक्रारी

बाजारपेठेत जाताय मोबाइल सांभाळा; महिन्यात दहा तक्रारी

हिंगोली : शहरातील गांधी चौक बाजार, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात जाताय तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा, अशी सांगण्याची वेळ आली आहे. शहरातील या भागात नागरिकांचे मोबाइल चोरीला, हरवल्याच्या तक्रारी आहेत.

मोबाइल प्रत्येकाकडे आला असून, अत्यावश्यक वस्तू बनली आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांची कुंडली मोबाइलमध्ये जतन करून ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महागडा मोबाइल वापरण्याची क्रेझ तयार झाली आहे. त्यामुळे मोबाइल चोरणाऱ्यांची टोळीही सक्रिय झाली असून, दररोज मोबाइल चोरीच्या अथवा गहाळ होण्याच्या घटना घडत आहेत. हिंगोली शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोंढा परिसरात मोबाइ गहाळ होण्याच्या घटना घडल्या आहेत. २०२० मध्ये शहरातील विविध भागातून ७१ नागरिकांनी आपले मोबाइल हरवले आहेत तर २०२१ मध्ये जूनपर्यंत ५७ जणांनी आपले मोबाइल गहाळ केले आहेत. गहाळ झालेले मोबाइल सहसा सापडतीलच याची शाश्वती नसते.

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम हे करा...

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा, मोबाइल सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी कंपनीच्या नंबरवर कळवा. चोरीला गेलेला मोबाइल पासवर्ड ऑनलाइनद्वारे बदला. पंधरा अंकी आयएमएआय नंबर माहिती असल्यास तो प्रथम पोलीस ठाण्यात कळवा. एफआयआर नोंदविल्यानंतर तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाइलवरून काही चूक झाल्यास त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जात नाही.

सहा महिन्यात २० मोबाइल शोधण्यात यश

चोरीला अथवा गहाळ झालेला मोबाइल सापडणे कठीणच आहे. सायबर सेलच्या मदतीने आयएमएआय नंबर ट्रेस झाल्यास मोबाइल सापडण्याची शक्यता असते. मात्र अनेक महिने मोबाइल ट्रेस होण्यास वेळ लागतो. तरीही हिंगोली शहर पोलिसांनी जून महिन्यात एका चोरट्यांकडून २० मोबाइल जप्त केले असून, त्यातील काही मोबाइल मूळमालकांना परतही केले आहेत.

मागील महिन्यातच एका मोबाइल चोरट्याचा शोध घेऊन त्याच्याकडून २० मोबाइल जप्त केले आहेत. यातील काही मोबाइल मूळमालकांना परतही केले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपला मोबाइल जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.

- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर

या ठिकाणी सांभाळा मोबाइल

गांधी चौक बाजार

गांधी चौक बाजार भागात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते. गर्दीचा फायदा घेऊन काही चोरटे मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी या भागातून दोन मोबाइल चोरीला गेले आहेत.

जवाहर रोड

शहरातील जवाहर रोड भागातून वाहनांची वर्दळ असते. या भागातून मागील वर्षी दोन मोबाइल चोरीला गेले असल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात आहे.

रेल्वे स्टेशन

हिंगोली येथील रेल्वे स्टेशन नियमित गजबजलेले राहत नसले तरी रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे मोबाइल गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे.

बसस्थानक

येथील बसस्थानक भागातूनही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या ठिकाणी आपला मोबाइल जपून ठेवणे गरजेचे आहे.

मोबाइल गहाळ, चोरीला गेल्याच्या तक्रारी

वर्ष, महिना गहाळ चोरीला गेले

२०२० ७१ ०४

२०२१ जानेवारी ०६ ००

फेब्रुवारी ०८ ००

मार्च ०४ ००

एप्रिल ११ ००

मे १४ ०१

जून १४ ००

जुलै ०२ ००

Web Title: Handle mobiles as they go to market; Ten complaints a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.