शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

अवकाळीमुळे शेतीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:04 IST

जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. महावितरणचे खांब पडले. प्रशासनाने तहसीलकडून शेती नुकसानीचा अहवाल मागविला आहे.गोरेगाव परिसरात नुकसानगोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुफान वाºयासह तब्बल दीड तास गारांसह पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेल्या टोळ कांदा बियाणे पिकाची प्रचंड नासाडी झाली. वादळी वाºयामुळे मोठी झाडे कोसळली असून आंब्याच्या कैºया पूर्णत: गारांमुळे पडून नुकसान झाले आहे. शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.कनेरगाव वीज खंडितकनेरगाव नाका : ४ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून असून कनेरगाव, फाळेगाव देवठाणा भोयर कानरखेडा बु., कानरखेडा खु., मोप आदी भागातील शेतकºयांचे केळीचे तसेच सत्र्यांच्या बागाचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फाळेगाव येथील डॉ. सारडा यांच्या शेतातील शाळेची संरक्षक भिंत कोसळली. तर शेतातील आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयामुळे वीजपुरवठा खंडित झाला सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला अन् विहिरीवर जावून पाणी आणावे लागले.करवाडीत बकºयाचा मृत्यूनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूरअंतर्गत असलेल्या करवाडी येथे ४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून वादळी वारे पाऊस सुरू झाला. वाºयामुळे शेतकºयांनी एकच धावपळ सुरू झाली. शेतकरी केशव भुगाजी कºहाळे हे काल शेतामध्ये शेळ्या चारत होते. अचानक वारे आणि पाऊस सुरू झाला आणि बकºयाचा जागीच मृत्यू झाला. या शेतकºयाचे अंदाजे तीन ते चार हजारांचे नुकसान झाले.्रपानकनेरगावात पाऊसपानकनेरगाव : येथील परिसरात वातावरणात बदल होऊन गुरुवारी सायंकाळी वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे झाडे उन्मळून पडली. काहींच्या घरावरील टीनपत्रे उडाले. आंब्याचे नुकसान झाले. वाळत ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकºयांची धांदल उडाली. शुक्रवारीही ढगाळ वातावरण कायम होते. बळीराजा हतबल झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती