शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला शिवशाहीचा विसर पडलाय-देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:14 IST

सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशाही देशात शिवशाहीचे आदर्श मूल्य पायदळी तुडविले जात असल्याचे परखड मत जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी बोलताना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रवक्ते प्रवीण देशमुख (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशाही देशात शिवशाहीचे आदर्श मूल्य पायदळी तुडविले जात असल्याचे परखड मत जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी बोलताना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रवक्ते प्रवीण देशमुख (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.अ‍ॅड.ग्यानबाराव सिरसाट विचारमंच महावीर भवन येथे जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, उद्घाटक उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रमुख उपस्थिती सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, परभणीचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र तांबिले, बाबाराव श्रृंगारे आदींची उपस्थिती होती. 'छत्रपती शिवारायांच्या शिवशाहीचा आदर्श व वर्तमान लोकशाहीचा परामर्श' या विषयावर पुढे बोलताना प्रवीण देशमुख म्हणाले की, स्वराज्यात महिला सुरक्षित होती. पण, आज चार मिनिटाला महिलांवर बलात्कार होतो. स्त्री विषयक दृष्टीकोण बदलला आहे. लोकशाहीची व्याख्याही राजकारण्यांनी बदलली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रक्तपाताशिवाय लोकांच्या जीवनात परिवर्तन करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. पण, बाबासाहेबांच्या या विचाराला आज राज्यकर्त्यांकडून छेद दिला जातो.हिंदू, मुस्लिम यांच्यात वाद घडवून दंगली घडविल्या जातात. छत्रपतींच्या धर्मनिरपेक्ष कारभाराचा विसर पडला आहे. कुरणाचे पान जमिनीवर पडले असले तरी छत्रपती शिवराय ते पान मस्तकी लावून मुस्लिम मावळ्याच्या हवाली करायचे, हा इतिहास आहे.कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्वप्रथम कर्जमाफी केली. त्यानंतर छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजेंनी कर्जमाफी केली. आताच्या सरकारकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायला पैसे आहेत; मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच स्वयंघोषित संत हे समाजासाठी दिशादर्शक नसून धार्मिक दलाल झाले असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. देशात अनागोंदी कारभार सुरू असून, सरकारविरूद्ध बोलणाºया दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या केली जाते. भीमा- कोरेगावसारख्या दंगली घडविल्या जातात. हे सर्व थांबवायचे असेल तर आम्हाला शिवशाहीतील धार्मिक धोरण, संहिष्णुता, स्त्री स्वातंत्र्य, शेतकरी धोरण, समता अंगिकारणे गरजेचे आहे. तेव्हाच लोकशाहीत शिवशाही अवतरेल, असा आशावाद प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन राधाकिशन कºहाळे, प्रास्ताविक शिवाजीराव ढोकर पाटील यांनी केले. परिचय ज्ञानेश्वर लोंढे यांनी करून दिला. तर आभार प्रा.माणिक डोखळे यांनी मानले.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीSocialसामाजिक