शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

सरकारला शिवशाहीचा विसर पडलाय-देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:14 IST

सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशाही देशात शिवशाहीचे आदर्श मूल्य पायदळी तुडविले जात असल्याचे परखड मत जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी बोलताना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रवक्ते प्रवीण देशमुख (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशाही देशात शिवशाहीचे आदर्श मूल्य पायदळी तुडविले जात असल्याचे परखड मत जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी बोलताना डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रवक्ते प्रवीण देशमुख (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.अ‍ॅड.ग्यानबाराव सिरसाट विचारमंच महावीर भवन येथे जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, उद्घाटक उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रमुख उपस्थिती सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, परभणीचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र तांबिले, बाबाराव श्रृंगारे आदींची उपस्थिती होती. 'छत्रपती शिवारायांच्या शिवशाहीचा आदर्श व वर्तमान लोकशाहीचा परामर्श' या विषयावर पुढे बोलताना प्रवीण देशमुख म्हणाले की, स्वराज्यात महिला सुरक्षित होती. पण, आज चार मिनिटाला महिलांवर बलात्कार होतो. स्त्री विषयक दृष्टीकोण बदलला आहे. लोकशाहीची व्याख्याही राजकारण्यांनी बदलली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रक्तपाताशिवाय लोकांच्या जीवनात परिवर्तन करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. पण, बाबासाहेबांच्या या विचाराला आज राज्यकर्त्यांकडून छेद दिला जातो.हिंदू, मुस्लिम यांच्यात वाद घडवून दंगली घडविल्या जातात. छत्रपतींच्या धर्मनिरपेक्ष कारभाराचा विसर पडला आहे. कुरणाचे पान जमिनीवर पडले असले तरी छत्रपती शिवराय ते पान मस्तकी लावून मुस्लिम मावळ्याच्या हवाली करायचे, हा इतिहास आहे.कर्जमाफीविषयी बोलताना ते म्हणाले जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्वप्रथम कर्जमाफी केली. त्यानंतर छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजेंनी कर्जमाफी केली. आताच्या सरकारकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायला पैसे आहेत; मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच स्वयंघोषित संत हे समाजासाठी दिशादर्शक नसून धार्मिक दलाल झाले असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. देशात अनागोंदी कारभार सुरू असून, सरकारविरूद्ध बोलणाºया दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या केली जाते. भीमा- कोरेगावसारख्या दंगली घडविल्या जातात. हे सर्व थांबवायचे असेल तर आम्हाला शिवशाहीतील धार्मिक धोरण, संहिष्णुता, स्त्री स्वातंत्र्य, शेतकरी धोरण, समता अंगिकारणे गरजेचे आहे. तेव्हाच लोकशाहीत शिवशाही अवतरेल, असा आशावाद प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन राधाकिशन कºहाळे, प्रास्ताविक शिवाजीराव ढोकर पाटील यांनी केले. परिचय ज्ञानेश्वर लोंढे यांनी करून दिला. तर आभार प्रा.माणिक डोखळे यांनी मानले.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीSocialसामाजिक