‘फूल पिकांची काढणी वेळेवर करावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST2021-05-12T04:30:54+5:302021-05-12T04:30:54+5:30

अनियमित वीज पुरवठा कळमनुरी: शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून ...

‘Flower crops should be harvested on time’ | ‘फूल पिकांची काढणी वेळेवर करावी’

‘फूल पिकांची काढणी वेळेवर करावी’

अनियमित वीज पुरवठा

कळमनुरी: शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत, अशी ग्राहकांची तक्रार आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

ज्वारीचा कडबा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

हिंगोली: सद्य:स्थितीत उन्हाळा असला तरी अधून-मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे कडबा भिजण्याची शक्यता असते. कडबा भिजल्यास कडब्याची प्रत खालावते. भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत. तेव्हा शेतकऱ्यांनी कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कनेरगाव नाक्यातील पथदिवे बंद

कनेरगाव नाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील वॉर्ड क्र. १ व वॉर्ड क्र. २ मधील पथदिवे मागील पंधरा दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रात्रीच्यावेळी चालताना नागरिकांना त्रास होत आहे. याचबरोबर गावात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. या सर्व बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: ‘Flower crops should be harvested on time’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.