शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:31 PM

गेल्या चार वर्षांपासून प्रशासकाकडून कारभार सुरू असलेल्या आखाडा बाळापूरच्या बाजार समितीवर लवकरच लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे.

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : गेल्या चार वर्षांपासून प्रशासकाकडून कारभार सुरू असलेल्या आखाडा बाळापूरच्या बाजार समितीवर लवकरच लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. बाजार समितीच्या मतदार यादीवर अंतिम हात फिरवण्यात आला असून याद्यांना मान्यता मिळताच निवडणूक कार्यक्रम घोषित होवू शकतो. १५ गणांमधील १२० गावांतील तब्बल १५ हजार ३८४ मतदारसंख्या असलेल्या या बाजार समिती निवडणुकीकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. 

आखाडा बाळापूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यापूर्वी ७ मार्च २०१० रोजी झाली. ८ मार्च २०१५ रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर ३१ मार्च २०१५ पासून या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. तेव्हापासून येथे निवडणुकांचा कार्यक्रम न घेता प्रशासकाचा कारभार सुरू होता. राजकीय शह- काटशह देत येथे निवडणुका टाळल्या गेल्या. युती सरकारकडून मध्यंतरी अशासकीय मंडळ नियुक्तीचे सोपस्कर जवळपास पूर्ण झाले होते. मंडळावर वर्णी लागणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीत ये- जा सुरू करून कर्मचाऱ्यांवर फर्मान सोडणेही सुरू केले होते. पण हिंगोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय बोंढारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अशासकीय मंडळ न नियुक्त करता निवडणुका घेण्याची मागणी केली.

त्यानुसार तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पण मध्येच मतदार यादीत शेतकऱ्यांच्या नावांचा सहभाग करण्याचा नियम आला. त्याआधारे निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने न्यायालयाकडून मुदतवाढ मिळवली. आता नवीन नियमाप्रमाणे मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर अंतिम हात फिरवण्यात आला आहे. त्यानुसार बाजार समिती कार्यक्षेत्रातील १२० गावांचा सहभाग आहे. त्याच १५ गण तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये आखाडा बाळापूर गण (१५ गावे ३३७९ मतदार), शेवाळा गण (८ गावे ३५९५ मतदार), घोडा गण (६ गावे ३२३२ मतदार), कांडली गण (९ गावे ३४४० मतदार), वारंगा गण (७ गावे ३५७९ मतदार), डोंगरकडा गण (६ गावे ३७३९ मतदार), जवळा पांचाळ गण (७ गावे ३५९८ मतदार), दांडेगाव गण (७ गावे ३२५१ मतदार), पेठवडगाव गण (९० गावे ३२०० मतदार), सिंदगी गण ( ६ गावे ३५७० मतदार), नांदापूर गण (९ गावे ३५५७ मतदार), पिंपळदरी गण (८ गावे ३१८२ मतदार), जलालदाभा गण (८ गावे ३१८५ मतदार), लाख गण (९ गावे ३२९० मतदार), कोथळज गण ( ९ गावे ३६१० मतदार) अशा तीन तालुक्यातील १५ गणांमध्ये १२० गावांचा सहभाग असून, ५१, ३८४ एवढ्या शेतकरी मतदारांचा सहभाग आहे. या मतदार याद्यांना मंजुरी मिळताच कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होऊ शकते.

पाच प्रशासकांनी पाहिला कारभारबाजार समितीने ३१ मार्च २०१५ पासून पाच प्रशासक पाहिले. प्रथम माहोरे, बोलके, चौधरी, फिसके आणि सध्या मैत्रेवार यांचा कार्यभार सुरू आहे. चार वर्षांत पाच प्रशासकांचा कारभार पाहिल्यानंतर आता निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. 

चार बूथवरून थेट १२५ बूथची भरारीआखाडा बाळापूर बाजार समिती निवडणुकांसाठी यापूर्वी केवळ चार बुथवर मतदार प्रक्रिया पार पडायची. पणआता १२० गावात किमान १२५ बुथवर मतदान होणार आहे. चार बुथ ते १२५ बुथही वाढ असून चार ते पाच लाखांचा निवडणूक खर्च आता २५ ते ३० लाखांत जाण्याची शक्यता आहे. 

मिनी विधानसभेचे रूपबाळापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र कळमनुरी, औंढा आणि हिंगोली अशा तीन तालुक्यात विस्तारलेले आहे. प्रत्येक गावातील शेतकरी आता मतदार बनल्यामुळे बाजार समितीला मिनी विधानसभेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १२० गावातील ५१, ३८४ मतदारांपर्यंत पोहीचण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. या निमी विधानसभेकडे राजकीय पक्षांनीही गांभिर्याने पाहणे सुरू केले आहे. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूकHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्र