शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

शेतकरी घालणार राज्य शासनाचे श्राद्ध; सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू आहे अन्नत्याग आंदोलन

By विजय पाटील | Updated: December 9, 2023 16:52 IST

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ

हिंगोली: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे परंतु शासनाला मात्र शेतकऱ्यांची कीव येत नाही. यासाठी तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अन्नत्याग आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्यामुळे रविवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी बांधव राज्य शासनाचे श्राद्ध घालणार आहेत.

गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर गजानन कावरखे , संजय मुळे , रामेश्वर कावरखे , मदन कावरखे , अक्षय पाटील सुनील मधुरवाड आदी शेतकऱ्यांनी  मागणीसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणी साठी अन्नत्याग आंदोलन ८ डिसेंबर पासून सुरू केले आहे. दरम्यान गोरेगाव सह परिसरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला जात असून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जात आहेत.

गत चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी तर पाऊस कमी झाला दुसरीकडे विविध रोगांमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव झाला आणि सोयाबीन हातचे गेले. कापूस तुरीचीही तीच अवस्था आज जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाने साथ सोडली असली तरी रब्बी हंगामात शासन शेतकऱ्यांना मदत करेल, शेतमालाला योग्य भाव देईल असे वाटले होते. परंतु, शासन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत आहे. शेतकरी सध्या कर्जबाजारी झाला असून बँकेचे कर्ज कसे फेडावे या अभी वंचित आहे. शेतकरी जगला तर देश जगेल असे शासन करते म्हणत असले तरी शेतकऱ्यांना शासनाचा कवडीचाही आधार राहिला नाही उलट आंदोलन करत्या शेतकऱ्यांवर शासन गुन्हे दाखल करत आहे. एवढेच काय आंदोलन करू नका, असेही सांगत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे  शेतीमालाला शासन योग्य भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे मागच्या दोन आठवड्यांपूर्वी गोरेगाव व परिसरातील सात ते आठ शेतकरी अवयव विक्रीसाठी मुंबई येथे गेले होते परंतु शासनाने मुंबई येथे गेलेल्या शेतकऱ्यांवर दडपशाही करत त्यांचे आंदोलन मोडीत काढले यापुढे जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा यावेळी शासनकर्त्यांनी दिला पोलीस बाळाचा वापर वारंवार हे सरकार करत आहे अशावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहिला नाही. आत्महत्या रोखायचे असतील तर शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करून महाराष्ट्र कर्जमुक्त करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे.

रविवारी घातली जाणार शासनाचे श्राद्ध...महाराष्ट्र तील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी आठ डिसेंबर पासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. दहा डिसेंबर रोजी अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शासनाने या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला नाही तर सकाळी ११ वाजता शासनाचे येतोचितपणे श्राद्ध घालण्यात येणार आहे.- गजानन कावरखे, गोरेगाव

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार