शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

By विजय पाटील | Updated: December 1, 2023 18:31 IST

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती.

हिंगोली : सततच्या नापिकीमुळे पीककर्ज भरण्याची ऐपत नसल्याने अवयव विक्रीसाठी मुंबईत गेलेल्या शेतकऱ्यांना आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी पाचारण केले. त्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेना आपल्या पाठीशी आहे. असे कोणतेही पाऊल उचलू नका, असे आवाहन केले.

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती. गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, संतोष वैद्य, गजानन जाधव, दीपक कावरखे, विजय कावरखे, धिरज मापारी यांचा यात समावेश आहे. तीन ते चार दिवस त्यांची कोणीच दखल घेतली नाही. शेवटी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ३० नोव्हेंबरला मातोश्रीवर गेले होते. तेथे खा.विनायक राऊत यांना भेटले. तेथून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आझाद मैदान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

१ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अवयव विक्रीसारखे कोणतेही पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाच्या विरोधात शिवसेना आंदोलन उभे करील, अशी ग्वाही दिली.

हिंगोलीत आंदोलन करणारहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रबी हंगामातील नुकसानीसाठी भरपाई मिळावी, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची भरपाई मिळावी यासाठी हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी