शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

By विजय पाटील | Updated: December 1, 2023 18:31 IST

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती.

हिंगोली : सततच्या नापिकीमुळे पीककर्ज भरण्याची ऐपत नसल्याने अवयव विक्रीसाठी मुंबईत गेलेल्या शेतकऱ्यांना आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी पाचारण केले. त्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेना आपल्या पाठीशी आहे. असे कोणतेही पाऊल उचलू नका, असे आवाहन केले.

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती. गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, संतोष वैद्य, गजानन जाधव, दीपक कावरखे, विजय कावरखे, धिरज मापारी यांचा यात समावेश आहे. तीन ते चार दिवस त्यांची कोणीच दखल घेतली नाही. शेवटी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ३० नोव्हेंबरला मातोश्रीवर गेले होते. तेथे खा.विनायक राऊत यांना भेटले. तेथून बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आझाद मैदान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

१ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अवयव विक्रीसारखे कोणतेही पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाच्या विरोधात शिवसेना आंदोलन उभे करील, अशी ग्वाही दिली.

हिंगोलीत आंदोलन करणारहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रबी हंगामातील नुकसानीसाठी भरपाई मिळावी, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीची भरपाई मिळावी यासाठी हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी