शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शेतकऱ्यांनो नि:संकोच तक्रारी करा; दोन कृषी केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित

By विजय पाटील | Updated: August 8, 2023 17:01 IST

कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांची लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी न भीता कृषी विभागाकडे तक्रार करावी.

- इस्माईल जहागिरदारवसमत (जि. हिंगोली) : शहरातील कृषी केंद्रांची जुलै महिन्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. या तपासणीत दोन कृषी केंद्र धारकांच्या दप्तरात त्रुटी आढळून आल्या. कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी अहवाल वरिष्ठस्तरावर पाठवला होता. यानंतर या दोन्ही दुकानांचे परवाने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.

वसमत शहरातील कृषी केंद्रांची जुलै महिन्यात तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे व पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकारी रामेश्वर गवळी यांनी तपासणी केली. तपासणीत महाराष्ट्र ॲग्रो एजन्सी व देवकृपा कृषी केंद्र यांच्या दप्तरात त्रुटी आढळून आल्या होत्या. कृषी अधिकाऱ्यांनी सदरील कृषी केंद्राचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला होता.

यानंतर १ ऑगस्ट रोजी जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दोन्ही कृषी केंद्राचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केल्याची सुनावणी केली. कृषी केंद्र धारक यांना मंगळवारी परवाने निलंबित केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वसमत शहरासह ग्रामीण भागातील कृषी केंद्रधारकांविषयी तक्रारी वाढत आहेत. सध्या युरियाची टंचाई करुन दुकानदार जादा दराने विक्री करत आहेत. शेतकऱ्यांनी काही तक्रारी असल्यास कृषी विभागाकडे कराव्या, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी नि:संकोचपणे तक्रारी कराव्यात...कृषी केंद्र धारक शेतकऱ्यांची लूट करत असतील तर शेतकऱ्यांनी न भीता कृषी विभागाकडे तक्रार करावी. तात्काळ तक्रारीची चौकशी करुन कारवाई केल्या जाईल. युरिया खताचा तुटवडा करुन दुकानदार खत विक्री करत असेल तर माहीती द्यावी.- रामेश्वर गवळी, पं. स. कृषी अधिकारी, वसमत.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी