शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मशागतीचे काम करत असलेल्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 18:39 IST

मशागत करताना शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हते

शिरडशहापूर (जि.हिंगोली): शेतात मशागतीचे काम करीत असताना एका शेतकऱ्याचा उष्माघातानेमृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे रविवारी (दि.२६) घडली. 

शिरडशहापूर येथील शेतकरी गंगाधर दामाजी आकमार (५२) हे आपल्या शेतात बैलजोडीद्वारे शेती मशागतीचे काम करीत होते. दुपारी अंदाजे ४ वाजता त्यांनी बैलजोडी लावून शेतात वखर लावला होता; परंतु त्यांना अचानक चक्कर आली व शेतातच बेशुद्ध पडले. ते शेतात एकटेच होते. संध्याकाळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी शेतात  वखरास जुंपलेल्या बैलजोडी जवळ ते बेशुद्धावस्थेत पडलेले होते.

नातेवाईकांनी त्यांना उठविण्याच्या प्रयत्न केला मात्र ते शुद्धीवर आले नाहीत. यावेळी रक्ताच्या उलटीमुळे त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते. यामुळे त्यांचा मृत्यूउष्माघातानेच झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतात आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एका पाठोपाठ पाच ते सहा जण उष्माघाताने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीagricultureशेतीSun strokeउष्माघात