शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वसमतच्या शेतकऱ्याला बीजोत्पादनाच्या प्रकल्पाने ना बाजाराची चिंता ना भावाची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:15 IST

यशकथा : बीजोत्पादन शेतीमध्ये कोणतीच रिस्क नसल्याने ही शेती फायदेशीर ठरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

- गंगाधर भोसले, (वसमत, जि. हिंगोली)

वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथील शेतकरी साहेबराव शिंदे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन बीजोत्पादनाकडे वाटचाल केली आहे. शिंदे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतीत कालसापेक्ष बदल करीत बीज उत्पादक कंपनीशी करार करून हमीभावाने बीज विक्री करीत आहेत. त्यामुळे बाजार शोधणे, भावातील घसरण याबद्दल कोणतीच काळजी न करता शेती करणे फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात. 

साहेबराव शिंदे एक वेळेस कांदा बीज विक्रीसाठी जालना मार्केटमध्ये गेले असता तेथे त्यांचा बीज उत्पादक कंपनीशी संबंध आला. त्यांनी बीजोत्पादन विषयक करार करून करार पद्धतीनेच बीजोत्पादन शेतीला सुरुवात केली. करार पद्धतीने बीजोत्पादन शेती केल्याने कंपनीच्या माध्यमातून बीज अथवा रोप शेतामध्ये उपलब्ध करून दिले जातात. त्याबरोबरच लागणारे खत, कीटकनाशके वापरण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळते, उत्पादित झालेले बीज शेतातूनच कंपनी खरेदी करते. खरेदी करारानुसार हमीभावातच खरेदी होते. शिवाय नगदी व्यवहार केला जातो. यामुळे बऱ्याच अडचणी सुटतात आणि बीजोत्पादन शेतीमध्ये कोणतीच रिस्क नसल्याने ही शेती फायदेशीर ठरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे आपल्या शेतात सीड्स प्लॉट खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात घेतात. यामध्ये कारला, भेंडी, दोडका, दुधी भोपळा, कांदा, मिरची यांचा समावेश असून प्रत्येक भाजीपाल्याच्या बीजोत्पादनासाठी जवळपास चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो त्यामुळे वर्षभरातून दोन टप्प्यांत सहजपणे बीजोत्पादन घेता येते. कांदा, भेंडी आणि दोडका या भाजीपाला बीजोत्पादनासाठी साधारणत: एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो आणि एकरी ५० ते ५५ हजारांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.

या उत्पादनासाठी चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो. वर्षातून दोन वेळा सीड्स प्लांट घेऊन एकरी एका लाखापेक्षा जास्त उत्पन्न शिंदे काढतात. त्यांना आठ एकर शेती असून मधुकर व मोहन या दोन मुलांसह सुना असे एकत्र कुटुंब असल्याने सर्वजण शेतीकामास मदत करतात. त्यामुळे त्यांना बीजोत्पादन शेती करणे सहज शक्य होते.

मिरची सीड्स प्लॉटमधून सर्वात जास्त उत्पन्न मिळते परंतु त्यासाठी शेडनेटसह कुशल कामगारांची गरज असते. दहा गुंठ्यातील प्लॉटसाठी जवळपास ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. या दहा गुंठ्यात रोप लागवडीपासून ४५ दिवसाला नर-मादी फुलांचे पोलण (संकर) कराण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी पंधरा कुशल कामगारांची आवश्यकता असते. दहा गुंठ्यात एक क्विंटल बिजोत्पादन होते.

हे बीज ३ लाख ५० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कंपनी खरेदी करते. कंपनी हमीभाव देते, सर्व सुविधा कंपनीद्वारे शेतापर्यंत पोहोचविल्या जातात. मोफत मार्गदर्शनही मिळते. त्यामुळे पारंपारिक शेती आणि भाजीपाला उत्पन्नापेक्षाही बीजोत्पादन फायदेशीर ठरत असल्याचे साहेबराव शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी