शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसमतच्या शेतकऱ्याला बीजोत्पादनाच्या प्रकल्पाने ना बाजाराची चिंता ना भावाची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:15 IST

यशकथा : बीजोत्पादन शेतीमध्ये कोणतीच रिस्क नसल्याने ही शेती फायदेशीर ठरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

- गंगाधर भोसले, (वसमत, जि. हिंगोली)

वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे येथील शेतकरी साहेबराव शिंदे यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन बीजोत्पादनाकडे वाटचाल केली आहे. शिंदे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतीत कालसापेक्ष बदल करीत बीज उत्पादक कंपनीशी करार करून हमीभावाने बीज विक्री करीत आहेत. त्यामुळे बाजार शोधणे, भावातील घसरण याबद्दल कोणतीच काळजी न करता शेती करणे फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात. 

साहेबराव शिंदे एक वेळेस कांदा बीज विक्रीसाठी जालना मार्केटमध्ये गेले असता तेथे त्यांचा बीज उत्पादक कंपनीशी संबंध आला. त्यांनी बीजोत्पादन विषयक करार करून करार पद्धतीनेच बीजोत्पादन शेतीला सुरुवात केली. करार पद्धतीने बीजोत्पादन शेती केल्याने कंपनीच्या माध्यमातून बीज अथवा रोप शेतामध्ये उपलब्ध करून दिले जातात. त्याबरोबरच लागणारे खत, कीटकनाशके वापरण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळते, उत्पादित झालेले बीज शेतातूनच कंपनी खरेदी करते. खरेदी करारानुसार हमीभावातच खरेदी होते. शिवाय नगदी व्यवहार केला जातो. यामुळे बऱ्याच अडचणी सुटतात आणि बीजोत्पादन शेतीमध्ये कोणतीच रिस्क नसल्याने ही शेती फायदेशीर ठरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे आपल्या शेतात सीड्स प्लॉट खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात घेतात. यामध्ये कारला, भेंडी, दोडका, दुधी भोपळा, कांदा, मिरची यांचा समावेश असून प्रत्येक भाजीपाल्याच्या बीजोत्पादनासाठी जवळपास चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो त्यामुळे वर्षभरातून दोन टप्प्यांत सहजपणे बीजोत्पादन घेता येते. कांदा, भेंडी आणि दोडका या भाजीपाला बीजोत्पादनासाठी साधारणत: एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो आणि एकरी ५० ते ५५ हजारांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.

या उत्पादनासाठी चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो. वर्षातून दोन वेळा सीड्स प्लांट घेऊन एकरी एका लाखापेक्षा जास्त उत्पन्न शिंदे काढतात. त्यांना आठ एकर शेती असून मधुकर व मोहन या दोन मुलांसह सुना असे एकत्र कुटुंब असल्याने सर्वजण शेतीकामास मदत करतात. त्यामुळे त्यांना बीजोत्पादन शेती करणे सहज शक्य होते.

मिरची सीड्स प्लॉटमधून सर्वात जास्त उत्पन्न मिळते परंतु त्यासाठी शेडनेटसह कुशल कामगारांची गरज असते. दहा गुंठ्यातील प्लॉटसाठी जवळपास ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. या दहा गुंठ्यात रोप लागवडीपासून ४५ दिवसाला नर-मादी फुलांचे पोलण (संकर) कराण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यासाठी पंधरा कुशल कामगारांची आवश्यकता असते. दहा गुंठ्यात एक क्विंटल बिजोत्पादन होते.

हे बीज ३ लाख ५० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कंपनी खरेदी करते. कंपनी हमीभाव देते, सर्व सुविधा कंपनीद्वारे शेतापर्यंत पोहोचविल्या जातात. मोफत मार्गदर्शनही मिळते. त्यामुळे पारंपारिक शेती आणि भाजीपाला उत्पन्नापेक्षाही बीजोत्पादन फायदेशीर ठरत असल्याचे साहेबराव शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी