शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शेतकरी हवालदिल! हळद बारा हजारांखाली तर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठेना!

By रमेश वाबळे | Updated: December 28, 2023 17:47 IST

भाववाढीची प्रतीक्षा आणखी किती दिवस कारायची?...

हिंगोली : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट होत असताना दुसरीकडे हा माल कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मार्केट यार्डात सध्या हळदीचे दर १२ हजारांखाली आले आहेत. तर सोयाबीनही पाच हजारांचा पल्ला गाठत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

येथील बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. समाधानकारक भाव, मोजमापात विश्वासाहर्ता, रोख व्यवहार यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या मार्केटकडे आहे. यंदा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ४ ते ५ हजार क्विंटलची आवक होत होती. त्यावेळी सरासरी भावही जवळपास १५ हजार रुपये मिळत होता. परंतु, भावात आणखी वाढ होईल, या आशेमुळे काही शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. परंतु, भाव वधारण्याऐवजी घसरले. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून भावात घसरण होत गेली. क्विंटलमागे दोनशे ते चारशे रुपयांच्या फरकात भाव आहेत.

मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २३ ते २६ डिसेंबरदरम्यान सुटी, ख्रिसमसमुळे बंद ठेवण्यात आले होते. तर २७ डिसेंबर रोजी हळदीची बिट झाली. या दिवशी आवक वाढून २ हजार ८०० क्विंटलवर गेली. तर सरासरी ११ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. ऑगस्ट, सप्टेंबरच्या तुलनेत सध्या क्विंटलमागे तीन हजार रुपयांनी भाव कमी मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

यंदा सोयाबीनही पाच हजारांचा पल्ला गाठत नसल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भाव काही वधारत नसल्याचे चित्र आहे. सध्या सरासरी ५०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. तर सरासरी ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. घटलेले उत्पादन आणि सध्या मिळत असलेला भाव लक्षात घेता लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भाववाढीची प्रतीक्षा आणखी किती दिवस कारायची?...शेतकऱ्यांकडे नवे सोयाबीन उपलब्ध होऊन जवळपास दीड ते दोन महिने झाले. परंतु, भाव पडत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. परंतु, भाव काही पाच हजारांवर जात नसल्याने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हळद उत्पादकांची परिस्थितीही वेगळी नसून, भाववाढीची प्रतीक्षा आहे.

मोंढ्यात हरभरा स्थिर...येथील मोंढ्यात मागील पंधरवड्यापासून हरभऱ्याचे भाव स्थिर आहेत. गुरूवारी ८० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ४ हजार ९५० ते ५ हजार ४०० रूपये भाव मिळाला. तर सरासरी ५ हजार १७५ रूपये भाव राहिला. सध्या भाव स्थिर आहेत. परंतु, येणाऱ्या दिवसात भावात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.

गहू, ज्वारी, तुरीची आवक मंदावली...सध्या मोंढ्यात गहू, ज्वारी, तुरीची आवक मंदावली आहे. २८ डिसेंबर रोजी गहू आणि तूर प्रत्येकी ५ क्विंटल झाली होती. आवक मंदावल्याने गव्हाचे दर वधारले असून, सरासरी २ हजार ८०० रूपये क्विंटलने विक्री होत आहे. तर तुरीची आवक मंदावली तरी दरवाढ होत नसल्याचे चित्र आहे. ६ हजार ६०० रूपये क्विंटलने तुरीची विक्री झाली. ज्वारीची आवकही कमी होत असून, सरासरी ३ हजार रूपयांचा भाव मिळत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली