शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 18:22 IST

विषारी कीटकनाशक घेतले; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले

हिंगोली: औंढा नागनाथ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत दोन वर्षांपासून पीक कर्ज मंजूर होत नसल्याच्या रागात एका शेतकऱ्याने विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे औंढा येथे एकच खळबळ उडाली. ही घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. संबंधित शेतकऱ्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील जोडपिंपरी येथील रहिवासी भूजंग माणिकराव पोले (वय ३६) हे दत्तक असलेल्या महाराष्ट्र बँक शाखेत मागील दोन वर्षांपासून पीक कर्जाची मागणी करीत होते. पीक कर्ज मंजूर करावे, यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून मागील अनेक महिन्यांपासून बँकेचे खेट्या मारत होते. परंतु ‘सीबील’च्या नावाखाली बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात येत नसल्याने शेवटी हवालदिल होऊन भूजंग पोले यांनी बुधवारी बँकेत मॅनेजरसमोरच सोबत आणलेले कीटकनाशक पिण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँक कर्मचारी व इतरांनी तत्काळ धाव घेत कीटकनाशक औषधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सदर शेतकऱ्याने किती प्रमाणात औषध घेतले हे कळू शकले नाही. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात संबंधित शेतकऱ्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीbankबँक