शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

By विजय पाटील | Updated: March 20, 2024 18:22 IST

समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता.

हिंगोली : तालुक्यातील माळसेलू येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार १९ मार्च रोजी रात्री उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील विलास श्रीराम वामन (वय २८) हा पदवीधर असून, काही दिवसांपासून तो एका खासगी रुग्णालयात काम करीत होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तो सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता.

दरम्यान, १९ मार्च रोजी दुपारी चार वाजता तो वडिलांना हिंगोली तालुक्यातील कडतीफाटा येथे सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याचे वडील रात्री घरी आल्यानंतर विलास घरी आलाच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी शेतात आढळून आली. त्यानंतर परिसरात पाहणी केली असता त्याचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने विलास याचा मृतदेह खाली काढला. त्याच्या खिशात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठी आढळून आली आहे. दरम्यान, मयत विलास याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण