कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! दरही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:38+5:302021-04-07T04:30:38+5:30

हिंगोली : कोरोना काळात शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक लिंबू, संत्री, मोसंबी फळांना प्राधान्य देत आहेत. मात्र जादा किंमत ...

Extract of lemons, oranges, citrus on Corona epidemic! Rates also increased | कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! दरही वाढले

कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंबीचा उतारा ! दरही वाढले

हिंगोली : कोरोना काळात शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नागरिक लिंबू, संत्री, मोसंबी फळांना प्राधान्य देत आहेत. मात्र जादा किंमत मोजूनही हिंगोली शहरात संत्रा, मोसंबी मिळत नसल्याचे चित्र आहे. ठोक बाजारातही फळे मिळत् नसल्याने मोजक्याच व्यापाऱ्यांकडे फळे दिसून येत आहेत.

जिल्ह्यात कोरोना आजाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध फळांचे सेवन करीत असल्याने बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. त्यात लिंबू, संत्री, मोसंबी या फळांना तर मोठी मागणी वाढली आहे. लिंबू या फळामध्ये व्हीटॅमिन सी असते. त्यामुळे शरिराचे कार्य टिकून ठेवण्यास व रोग प्रतिकार शक्ती नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय पचनक्रीयाही मजबूत होण्यासह रक्त शुध्द होण्यास मदत होते. संत्री हे सुद्धा शक्तीवर्धक फळ असून या फळाचे सेवन केल्यास शरीर व मन थंड राहते. थकवा, तणाव दूर होण्यास मदत होते. मोसंबी फळातही ए,बी,सी हे जीवनसत्व असल्याने पचनक्रीया सुधारण्यास मदत होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

दुपटीने वाढले दर

मोसंबी, संत्रीचे दर मागील महिन्याच्या तुलनेत दुपट वाढले आहेत. मागील महिन्यात १०० रूपये किलोप्रमाणे मिळणारी मोसंबी आता २०० रूपये मोजूनही मिळत नाही. तर संत्रीचे दरही दुप्पट वाढले आहेत.

संत्रा, मोसंबी औरंगाबाद, नांदेड येथून तर लिंबू जिल्ह्यातूनच

जिल्ह्यात मोसंबी, संत्रीच्या बागा घेवून व्यापारी जिल्ह्यातच विक्री करतात. आता जिल्ह्यात फळेच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे औरंगाबाद व नांदेड येथून संत्री व मोसंबी आणली जाते. सध्या त्याच जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. लिंबू मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पुरवठा होत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

संत्री, मोसंबी, लिंबू या फळात व्हिटॅमिन सी असते. तसेच ही फळे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना काळात शरिराची रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.

-डॉ. यशवंत पवार,

संत्री, मोसंबी, लिंबू ही फळे शक्तीवर्धक फळे आहेत. सध्या कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता या फळांचे सेवन करणे चांगले आहे. यात व्हिटॅमिन सी असल्याने शरिरासाठी फायदेशीर ठरते.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकीत्सक

इम्युनिटी वाढते ! मी फळे खातो तुम्हीही खा !!

शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होत असल्याने मी नेहमी संत्रा, मोसंबी ही फळे खातो. सध्या ही फळे मिळणेच दुरापस्त झाले आहेत. दररोजच्या जेवनात मात्र लिंबू असतेच.

- समाधान भिसे

मार्च महिन्यापर्यंत संत्रा, मोसंबी ही फळे बाजारात उपलब्ध होत असल्याने खात होतो. आता मात्र फळाच्या किमती दुप्पट वाढल्या असल्या तरी फळेच उपलब्ध होत नाहीत. लिंबू मात्र आवश्य आहारात घेतो.

- नागनाथ गंगावणे

प्रतिकिलो दर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

लिंबू ३० ४० ५० ६०

मोसंबी ८० ९० १०० २००

संत्री ४० ७० ९० १६०

Web Title: Extract of lemons, oranges, citrus on Corona epidemic! Rates also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.