मोफत शाळा प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST2021-03-22T04:26:53+5:302021-03-22T04:26:53+5:30

हिंगोली : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी आतापर्यंत ७३२ ऑनलाइन अर्ज आले आहेत. ...

Extension till March 30 for free school admission | मोफत शाळा प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

मोफत शाळा प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

हिंगोली : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी आतापर्यंत ७३२ ऑनलाइन अर्ज आले आहेत. अर्ज भरण्यास ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

दुर्बल व वंचित घटकातील मुलांना नामांकित खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी अशा शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार, या जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ३ मार्चपासून अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. अगोदर २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे अनेक ठिकाणचे ऑनलाइन सेंटर काही वेळापुरतेच उघडे राहत आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करताना पालकांनाही कसरत करावी लागत होती. त्यात अर्ज भरण्याची मुदत संपत आली होती, शिवाय काही दिवस ओटीपीचा अडथळाही निर्माण झाला होता. यातून अनेक पालकांचे मोफत प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे राहून गेले होते. आता पुन्हा ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

२१ मार्चपर्यंत ७३२ अर्ज

जिल्ह्यातील ७९ खासगी शाळांमध्ये ५३० जागा दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २१ मार्चपर्यंत ५३० जागांसाठी ७३२ ऑनलाइन अर्ज आले होते. मुदतवाढ मिळाल्याने यात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८१ जागांसाठी १ लाख ८३ हजार ५९५ ऑनलाइन अर्ज आले होते.

Web Title: Extension till March 30 for free school admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.