शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पाणीटंचाईमुळे शाळा दिली सोडून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:23 IST

शाळा समिती अध्यक्षांचा आदेश

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली वर्गणी

- रामा सारंग 

हयातनगर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील हयातनगर येथे पाणीटंचाईला त्रासलेल्या शाळा समिती अध्यक्षाने मंगळवारी चक्क शाळा सोडून देण्याचे आदेश मुख्याध्यापकांना दिले. पाठोपाठ मुख्याध्यापकांनी दुपारी एक वाजताच शाळा सोडून दिली. या घटनेची दिवसभर चर्चा होती.  

हयातनगर येथे जिल्हा परिषदेचे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून प्राथमिक व  माध्यमिक शाळा वेगळी आहे. शाळेची टोलेजंग इमारतही आहे. मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मागील काही महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. शाळेत दोन बोअर असून एकाच बोअरवेलमध्ये विद्युत मोटार आहे. त्यालाही पाणी येत नाही. एक हातपंप आहे. तोही कोरडा आहे. काही दिवस शिक्षकांनी स्वखर्चाने पाणी विकत आणून विद्यार्थ्यांची तहान भागविली. परंतु, परिसरात दमदार पाऊस न झाल्याने पाणी टंचाई कायम आहे. जिल्हा परिषदेची शाळा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. विद्यार्थ्यांना गावात जिथे मिळेल तिथे पाणी प्यावे लागते किंवा घरी जावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दररोज चार वाजता सुटणारी शाळा मंगळवारी अचानक दुपारी एक वाजताच सुटली. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

संतापलेल्या ग्रामस्थांनी मुख्याध्यापक साहेबराव नरवाडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘शाळेत पाणी नसेल तर विद्यार्थ्यांना सोडून द्या असे आदेश शाळा समितीच्या अध्यक्षांनी आम्हाला फोनवर दिला. म्हणून शाळा सोडून दिली.’ शाळेतील पाण्याचे नियोजन काय आहे ते शाळा समिती बघून घेईल आणि उपाय-योजनाही करेल, अशी प्रतिक्रिया सरपंच शांताबाई सारंग यांनी दिली. यासंदर्भात वारंवार प्रयत्न करूनही शाळा समिती अध्यक्ष सुनीता माधवराव सारंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

गावकऱ्यांनी केली वर्गणीशाळेत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मंगळवारी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला. लक्ष्मणराव सारंग व भगवानआप्पा राऊत यांनी काही वर्गणी करून शाळेत खाऊ शिजवणारे चंद्रकांत क्षीरसागर यांच्याकडे दिली. याशिवाय आणखीही मदत केली जाईल, असे शिवराम सोळंके व विठ्ठल महाराज गिरी म्हणाले. नेमकी किती वर्गणी दिली हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला. 

शाळा सोडण्याचा अधिकार अध्यक्षांना नसतोहयातनगर शाळेतील पाणी प्रश्नासंदर्भात मी उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. शाळेत पाणीटंचाई निर्माण झाल्यास शालेय समितीचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापकांनी उपाययोजना करणे आवश्यक आहेत. परस्पर शाळा सोडून देण्याचे आदेश समितीच्या अध्यक्षाला नसतात. - नवनाथ थोरात,गटशिक्षणाधिकारी (वसमत) 

टॅग्स :Waterपाणीzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीHingoliहिंगोली