शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

दररोज काहींच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला ...

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींच्या नशिबी मात्र शिवभोजन थाळीही राहत नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थींनी दिली. दुसरीकडे शिवभोजन थाळी वाढवून द्यावी, अशी मागणीही केंद्र चालकांनी शासनाकडे केली आहे.

गिबांना रोजच्या रोज अन्न मिळावे हा उद्देश समोर ठेवून शासनाने शिवभोजन थाळी मोफत सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळमनुरी ३, हिंगोली ३, वसमत २, सेनगाव १ आणि औंढा येथे २ असे शिवभोजन थाळीचे केंद्र उघडण्यात आले आहेत. शिवभोजनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. शिवभोजन थाळीसाठी वेळ कमी ठेवण्यात आला असल्यामुळे काहींंच्या नशिबी थाळी राहत नाही. शिवभोजन थाळीमध्ये २ पोळ्या, १ भाजीे, वरण आणि भात असे पदार्थ ठेवले आहेत. थाळीतील जेवण रुचकर असल्याची प्रतिक्रियाही लाभार्थिनी दिली. दुसरीकडे थाळीतील भाजी व पोळ्यांची संख्या वाढविल्यास पोटभर जेवण मिळेल, असे काही लाभार्थींचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र -११

रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या १२००

शहरातील एकूण शिवभोजन केंद्र- ३

शहरातील थाळी लाभार्थींची संख्या ४००

अंदाजे १५ जण उपाशी परतात...

हिंगोली शहरात नाईकनगर, सरकारी दवाखाना व नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित आहे. जेवणासाठी ११ ते ४ अशी वेळ दिली आहे. बहुतांशवेळा वेळेअभावी व थाळी संपल्यामुळे जवळपास जवळपास १५ जणांना जेवण न करताच घरी परतावे लागते. शिवभोजन थाळीमध्ये सध्या दोन पोळ्या व एक भाजी दिली जात आहे. शासनाने या शिवभोजन थाळीत तीन पोळ्या व एक भाजी वाढवून दिल्यास जेवण पोटभर होईल, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शिवभोजन केंद्रावरील थाळी संपल्यास काहींना उपाशीपोटीच परतावे लागत आहे.

रोज १ हजार ६०० लोकांचे भरते पोट; मग बाकीच्यांचे काय?

शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरिबांना अन्न मिळत आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर जवळपास १ हजार ६०० जण रोज जेवण करतात. केंद्र चालकांना शासनाकडून १५० शिवभोजन थाळी मिळते. पण ती थाळी अपुरी पडत आहे. शासनाने गरीबांचा विचार करून आणखी ७५ थाळी वाढवून देणे गरजेचे असताना मागणीचा काही शासन विचार करीत नाही, असे केंद्र चालकांचे म्हणणे आहे.

फाेटाे नं. ०७