शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

दररोज काहींच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला ...

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींच्या नशिबी मात्र शिवभोजन थाळीही राहत नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थींनी दिली. दुसरीकडे शिवभोजन थाळी वाढवून द्यावी, अशी मागणीही केंद्र चालकांनी शासनाकडे केली आहे.

गिबांना रोजच्या रोज अन्न मिळावे हा उद्देश समोर ठेवून शासनाने शिवभोजन थाळी मोफत सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळमनुरी ३, हिंगोली ३, वसमत २, सेनगाव १ आणि औंढा येथे २ असे शिवभोजन थाळीचे केंद्र उघडण्यात आले आहेत. शिवभोजनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. शिवभोजन थाळीसाठी वेळ कमी ठेवण्यात आला असल्यामुळे काहींंच्या नशिबी थाळी राहत नाही. शिवभोजन थाळीमध्ये २ पोळ्या, १ भाजीे, वरण आणि भात असे पदार्थ ठेवले आहेत. थाळीतील जेवण रुचकर असल्याची प्रतिक्रियाही लाभार्थिनी दिली. दुसरीकडे थाळीतील भाजी व पोळ्यांची संख्या वाढविल्यास पोटभर जेवण मिळेल, असे काही लाभार्थींचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र -११

रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या १२००

शहरातील एकूण शिवभोजन केंद्र- ३

शहरातील थाळी लाभार्थींची संख्या ४००

अंदाजे १५ जण उपाशी परतात...

हिंगोली शहरात नाईकनगर, सरकारी दवाखाना व नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित आहे. जेवणासाठी ११ ते ४ अशी वेळ दिली आहे. बहुतांशवेळा वेळेअभावी व थाळी संपल्यामुळे जवळपास जवळपास १५ जणांना जेवण न करताच घरी परतावे लागते. शिवभोजन थाळीमध्ये सध्या दोन पोळ्या व एक भाजी दिली जात आहे. शासनाने या शिवभोजन थाळीत तीन पोळ्या व एक भाजी वाढवून दिल्यास जेवण पोटभर होईल, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शिवभोजन केंद्रावरील थाळी संपल्यास काहींना उपाशीपोटीच परतावे लागत आहे.

रोज १ हजार ६०० लोकांचे भरते पोट; मग बाकीच्यांचे काय?

शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरिबांना अन्न मिळत आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर जवळपास १ हजार ६०० जण रोज जेवण करतात. केंद्र चालकांना शासनाकडून १५० शिवभोजन थाळी मिळते. पण ती थाळी अपुरी पडत आहे. शासनाने गरीबांचा विचार करून आणखी ७५ थाळी वाढवून देणे गरजेचे असताना मागणीचा काही शासन विचार करीत नाही, असे केंद्र चालकांचे म्हणणे आहे.

फाेटाे नं. ०७