शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

दररोज काहींच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला ...

हिंगोली: कोरोना काळात गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काहींच्या नशिबी मात्र शिवभोजन थाळीही राहत नाही, अशी प्रतिक्रिया लाभार्थींनी दिली. दुसरीकडे शिवभोजन थाळी वाढवून द्यावी, अशी मागणीही केंद्र चालकांनी शासनाकडे केली आहे.

गिबांना रोजच्या रोज अन्न मिळावे हा उद्देश समोर ठेवून शासनाने शिवभोजन थाळी मोफत सुरू केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळमनुरी ३, हिंगोली ३, वसमत २, सेनगाव १ आणि औंढा येथे २ असे शिवभोजन थाळीचे केंद्र उघडण्यात आले आहेत. शिवभोजनाची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. शिवभोजन थाळीसाठी वेळ कमी ठेवण्यात आला असल्यामुळे काहींंच्या नशिबी थाळी राहत नाही. शिवभोजन थाळीमध्ये २ पोळ्या, १ भाजीे, वरण आणि भात असे पदार्थ ठेवले आहेत. थाळीतील जेवण रुचकर असल्याची प्रतिक्रियाही लाभार्थिनी दिली. दुसरीकडे थाळीतील भाजी व पोळ्यांची संख्या वाढविल्यास पोटभर जेवण मिळेल, असे काही लाभार्थींचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र -११

रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या १२००

शहरातील एकूण शिवभोजन केंद्र- ३

शहरातील थाळी लाभार्थींची संख्या ४००

अंदाजे १५ जण उपाशी परतात...

हिंगोली शहरात नाईकनगर, सरकारी दवाखाना व नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे शिवभोजन थाळी केंद्र कार्यान्वित आहे. जेवणासाठी ११ ते ४ अशी वेळ दिली आहे. बहुतांशवेळा वेळेअभावी व थाळी संपल्यामुळे जवळपास जवळपास १५ जणांना जेवण न करताच घरी परतावे लागते. शिवभोजन थाळीमध्ये सध्या दोन पोळ्या व एक भाजी दिली जात आहे. शासनाने या शिवभोजन थाळीत तीन पोळ्या व एक भाजी वाढवून दिल्यास जेवण पोटभर होईल, असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. शिवभोजन केंद्रावरील थाळी संपल्यास काहींना उपाशीपोटीच परतावे लागत आहे.

रोज १ हजार ६०० लोकांचे भरते पोट; मग बाकीच्यांचे काय?

शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरिबांना अन्न मिळत आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर जवळपास १ हजार ६०० जण रोज जेवण करतात. केंद्र चालकांना शासनाकडून १५० शिवभोजन थाळी मिळते. पण ती थाळी अपुरी पडत आहे. शासनाने गरीबांचा विचार करून आणखी ७५ थाळी वाढवून देणे गरजेचे असताना मागणीचा काही शासन विचार करीत नाही, असे केंद्र चालकांचे म्हणणे आहे.

फाेटाे नं. ०७