शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

पुन्हा बिघडले वातावरण; प्रचारकांना चांगली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:43 PM

मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र दिवसभर जोमाने प्रचार करू शकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. यात आंबा उत्पादक शेतकरी जेरीस आला असून आंबा पाडाला येण्यापूर्वीच गळ लागल्याने कैऱ्यांचीच विक्री करावी लागत आहे. तर दुसरीकडे शिरवाळी वातावरणाचा लाभ उठवत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र दिवसभर जोमाने प्रचार करू शकत आहेत.दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४२ अंशांच्याही पुढे जात आहे. त्याचा परिणाम म्हणून हिंगोली जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारात रंगत भरत नसल्याचे दिसत आहे. गावोगाव, घरोघर भटकंती करण्यापेक्षा सर्कलच्या ठिकाणी अथवा मोठ्या गावांत सभा घेण्याचा सपाटा सुरू असल्याचे दिसते. त्याचबरोबर काही ठिकाणी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवरच प्रचाराचा भार टाकून त्यांना वाहनांद्वारे परिसरातील गावांत पक्षाचा प्रचार करण्यास सांगितले जात आहे. मात्र दुपारच्या वेळी ही मंडळी उन्हाच्या कडाक्यात घराबाहेर पडत नव्हती. आज मात्र ढग दाटल्याने शिरवाळी वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी दुपारीही प्रचार सुरू ठेवल्याचे पहायला मिळाले.जिल्ह्यातील काही भागात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. तर हिंगोलीसह परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरीही कोसळल्या. त्याचा कोणताच फायदा होणार नसला तरीही ढगाळी वातावरणाने तापमान खाली उतरल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक