शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस

By विजय पाटील | Updated: April 19, 2024 05:59 IST

भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला.

विजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली: भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला. त्यातच वंचितचा उमेदवार महायुती व महाविकास आघाडी दोघांनाही फटका देत असल्याने दोन्हींकडील मंडळी बेजार असल्याचे चित्र आहे. तब्बल ३३ उमेदवार येथे रिंगणात आहेत. महायुतीचे बाबूराव कदम, महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, वंचित बहुजन आघाडीचे बी.डी. चव्हाण यांच्यात चुरस आहे. महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीवरून असलेले ताणतणाव आता प्रचारातही दिसत आहेत. 

शिंदेसेनेचे  विद्यमान खा. हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या विरोधामुळे कापली गेली. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून  उमेदवारी दिल्याने ते तिकडेच गुंतले. तर कदम यांना मित्रपक्षांची म्हणावी तशी साथ अजूनही मिळत नाही. मविआचे नागेश आष्टीकरांनाही याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्वपक्षासह मित्रपक्षातील नाराजी संपत नसल्याचे दिसत आहे. वंचितच्या प्रचाराची गती संथच आहे.

पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत- हिंगोलीत आतापर्यंत शिवसेनेची काँग्रेस अथवा राष्ट्रवादीशी लढत होत आली आहे. येथे फक्त एकदाच भाजप लढली. त्यानंतर कायम शिवसेनेचाच उमेदवार राहिला. मात्र यावेळी शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गट आमने सामने आले आहेत. - युतीत भाजप तर आघाडीत काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर दिसत आहे. यात उमेदवारांना आपली स्वतंत्र यंत्रणा मैदानात - उतरवून प्रचार करावा लागत आहे.  - दर पाच वर्षांनी वेगळा कल देणारा तीन जिल्ह्यात विस्तारलेला हा मतदारसंघ यावेळी कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे हिंगोली जिल्हा हा ना उद्योग जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. यात स्थलांतरामुळे गावेच्या गावे ओस पडतात.हळद संशोधन केंद्र उभे राहणार असले तरीही दुसरे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगांबाबत नुसतीच आश्वासनांची खैरात आहे. शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा अभाव असून यासाठी इतर जिल्ह्यांत जावे लागते. त्याचा मोठा आर्थिक फटका प्रत्येक कुटुंबाला सोसावा लागतो.

एकूण मतदार    १८,१७,७३४ पुरुष - ९,४६,६७४महिला - ८,७१,०३५

गटातटाचा फटका नेमका कुणाला?- महायुतीत भाजप नेत्यांची नाराजी दूर झाली, पण कार्यकर्त्यांची झाली नाही. शिवाजी जाधव या भाजप बंडखोराने उमेदवारी कायम ठेवली आहे. अजित पवार गटही अंतर ठेवूनच जमेल तशी ताकद लावत आहेत. - मविआत हिंगोली जिल्ह्यातला उमेदवार हवा म्हणणाऱ्यांनी अजूनही प्रचारात जीव ओतला नाही. एक दोन नेते वगळता इतरांनी प्रचाराकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. 

२०१९ मध्ये काय घडले?हेमंत पाटील    शिवसेना(विजयी)    ५,८६,३१२ सुभाष वानखेडे    काँग्रेस    ३,०८,४५६मोहन राठोड    वं.बहुजन आघाडी    १,७४,०५१संदेश चव्हाण    अपक्ष    २३,६९० २०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी? वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    राजीव सातव    काँग्रेस        ४,६७,३९७ ४८.५९२००९    सुभाष वानखेडे    शिवसेना     ३,४०,१४८  ४१.६१२००४     सूर्यकांता पाटील    राष्ट्रवादी    ३,२७,९४४ ४५.०२१९९९    शिवाजी माने    शिवसेना २,९७,२८४ ४३.७७१९९८    सूर्यकांता पाटील    काँग्रेस    ३,४५,४३९  ५१.४३

टॅग्स :Hingoliहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४