शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे ३२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यातील २० पैकी १९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना वेळीच गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे ...

हिंगोली : जिल्ह्यातील २० पैकी १९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना वेळीच गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे ३२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

जिल्ह्यात लघु सिंचन विभागाच्या वतीने २० कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्याच्या माध्यमातून २ हजार ५० सघमी पाणीसाठा होणार असून यातून ४११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण, बंधारे ओसंडून वाहत होते. पावसाळ्यात पाणी वाहून गेले तरी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत व्हावी, यासाठी बंधाऱ्यांना गेट बसविण्याचे काम लघु सिंचन विभागाने हाती घेतले होते. जिल्ह्यातील २० कोल्हापुरी बंधाऱ्यांना ७५५ गेट आहेत. यातील १९ बंधाऱ्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत गेट बसविण्यात आले. त्यामुळे १९ बंधाऱ्यात पाणी जमा होण्यास मदत झाली. बंधाऱ्यांना गेट बसविण्यात आल्याने १७४ सघमी पाणीसाठा तयार झाला. यातून जवळपास ३२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. दरम्यान, बंधाऱ्यातील पाण्याने सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकाली निघाला आहे.